शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमविरोधात कारवाई सुरूच, ३९५ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:08 PM

Coronavirus : महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९५ गुन्ह्यांची (ज्यापैकी १७ N.C आहेत) नोंद १७ मे २०२० पर्यंत झाली आहे.सध्या लॉकडाउनच्या काळात ८-१७ या वयोगटातील मूले, स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर  समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ३९५ गुन्ह्यांची (ज्यापैकी १७ N.C आहेत) नोंद १७ मे २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १६९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २११ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

 

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

 

लॉकडाऊनमुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने अभिनेत्याने केली आत्महत्या 

 

खळबळजनक! पालघरमध्ये एका तासात सापडले दोन मृतदेह  

हिंगोली  जिल्ह्यातील कुरुंडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ७ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिकतेचा  रंग देणारा  टिकटॉक विडिओ बनवून , सदर विडिओ विविध सोशल मिडियावरून प्रसारित केला आहे ,त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. सध्या लॉकडाउनच्या काळात ८-१७ या वयोगटातील मूले, स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करत आहेत.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेषतः पालकांना विनंती करते कि, कृपया आपले पाल्य ऑनलाईन काय व कोणती वेबसाईट्स सर्फ करतात यावर लक्ष ठेवा .त्यांना ऑनलाईन कोणी काही फसवत नाही आहे. याची खबरदारी घ्या. शक्यतो आपल्या ऑफिसचा लॅपटॉप वा मोबाईल आपल्या पाल्यास हाताळायला देऊ नका. तसेच जर कोणी आपल्या पाल्यास ऑनलाईन फसवत असेल किंवा त्रास देत असेल व आपल्या पाल्याने जर आपणास हे सांगितले तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब द्या व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा. लॉकडाउनबाबत फक्त राज्य व केंद्र सरकार अधिकृतरित्या जी माहिती व नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील त्यावरच विश्वास ठेवा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका  असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलने केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र