शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:12 IST

या चकमकीत ३ पोलीस जखमी असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितले. आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली आहे. 

 मुंबई - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये आता विरोधकांकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. कुणाला तरी वाचवण्यासाठी सरकारने हे एन्काउंटर घडवून आणलं असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र अक्षयकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वरक्षणार्थ पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो ठार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. १० मिनिटांच्या या चकमकीत नेमकं काय घडलं हे जाणून घेणे गरजेचे आहे.

१३ ऑगस्ट २०२४ ला बदलापुरातील एका शाळेत २ अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आले. याच शाळेतील सफाई कामगार असलेल्या अक्षय शिंदेवर आरोप झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणामुळे लोकांमध्ये संताप होता. बदलापूर रेल्वे स्टेशनवर जमावाने ट्रेन रोकोही केला. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही ठिकाणी झटापटही झाल्याचे दिसून आले. बलात्कारातील आरोपी अक्षयला पोलिसांनी कोर्टासमोर हजर करत रिमांड घेतली होती. 

सोमवारी या प्रकरणी आरोपी अक्षयला पोलीस जेलमधून चौकशीसाठी नेत होते. त्यावेळी अक्षयनं सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कमरेला लावलेली बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यात प्रत्युत्तरात अक्षय शिंदे मारला गेला. मुंब्रा बायपास येथून जाताना अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरेकडून शासकीय बंदूक हिसकावली. त्यानंतर अक्षयने निलेशवर ३ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी निलेशला पायला लागली तर इतर २ गोळ्या हवेत मारल्या गेल्या. गोळी लागल्याने निलेश मोरे आणि अक्षय दोघेही जखमी झाले.

आरोपी अक्षय शिंदे आणि २ पोलीस हवालदारांसह एपीआय निलेश मोरे पोलीस व्हॅनच्या मागील बाजूस बसलेले होते. पुढे चालक आणि पोलीस निरिक्षक संजय शिंदे बसले होते. अक्षयला पोलिसांना शिवीगाळ करत होता असं पोलिसांचे म्हणणं आहे. निलेश मोरेकडील बंदूक हिसकावून अक्षयने गोळीबार केला त्यानंतर संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी अक्षयच्या दिशेने गोळी मारली. ही गोळी अक्षयच्या चेहऱ्याला लागली त्यात त्याचा मृत्यू झाला. 

पोलीस वाहनात कोण कोण होते?

जेव्हा अक्षयने गोळीबार केला तेव्हा पोलीस वाहनात ४ जण होते, त्यात २ अधिकारी आणि २ पोलीस शिपाई होते. या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राथमिक तपासात अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरेंच्या दिशेने गोळी झाडली त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या चकमकीत ३ पोलीस जखमी असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितले. आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली आहे. 

अक्षयच्या घरच्यांचा पोलिसांवर आरोप

पोलिसांनी बनाव रचून अक्षयला गोळी झाडून मारले, सोमवारी या घटनेच्या आधी आम्ही अक्षयला भेटायला गेलो होतो. त्यावेळी तो माझ्यावर चार्जशीट दाखल झालीय असं सांगितले. लवकरच तो सुटेल असं मी त्याला बोलली. अक्षय फटाके फोडायलाही घाबरतो, मग बंदूक कसं चालवू शकतो असा सवाल करत अक्षयच्या आईने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसEknath Shindeएकनाथ शिंदे