शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

भयंकर! सहा वाहनांच्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:31 IST

Accident Case : दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

ठळक मुद्देटेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन भावे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               

खाेपाेली  :  मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर सहा वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला, तर दाेनजण जखमी झाले आहेत. सदरचा अपघात आज सकाळी पावने सहाच्या सुमारास झाला. जखमींवीर खाेपाेली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. टेम्पो चालक अक्रम आणि कारमधील इर्शाद सिद्दिकी (३१. रा. बांद्रा पश्‍चिम) रोनक मोरदानी (२७ रा. खार,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने भाजी वाहून नेणाऱ्या टेम्पो ला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर भाजी वाहून नेणारा टेम्पो हा कारवर जोरदार धडकला. त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो हा पुन्हा ट्रेलरला आणि दाेन बसलाही धडकला.  त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगर पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार मधील मृत व्यक्तींच्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. एक्सप्रेस वेवर किलाेमिटर 39 येथे रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

अपघाताचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या संस्थेचे सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन  मृतदेह बाजूला काढले त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.                                                                                                                                                                             किलोमीटर ३९ जवळ सातत्याने अपहात हाेत आहेत. अपघातांची संख्या पाहता त्याला आळा बसावा म्हणून या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर एक लेन ३ किलोमीटर बंद करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये याच पट्ट्यामध्ये दोन ते तीन अपघात होऊन पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.            

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूMumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्ग