शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली 

By पूनम अपराज | Published: August 10, 2018 5:06 PM

एटीएस रात्रभर कारवाईत अख्ख आळी होती जागी; गावकरी वैभव राऊतच्या पाठीशी

मुंबई - नालासोपाऱ्यातील भांडार आळी येथे काल रात्री ७.३० वाजल्यापासून दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान आज सकाळी वैभव राऊतला ताब्यात घेऊन एटीएसचे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, रात्रभर चाललेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. वैभवच्या पाठीशी संबंध गाव असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यातील भांडार आळी गावात लक्षद्वीप या दुमजली इमारतीत वैभव आपल्या दोन काकांच्या कुटुंबियांसोबत राहतो. पूर्वजांपासून वैभवचे आई - वडील याठिकाणी राहतात. भांडार आळी हे १ हजार लोकांचं गाव असून या गावात वैभवची इस्टेट एजंट म्हणून ओळख आहे. पूर्वी वैभवच्या वडिलांचा ट्रांस्पोटेशनचा व्यवसाय होता. तर दुसरे काका शिवसैनिक होते आणि ते सध्या हयात नाहीत अशी माहिती गावकरी हर्षद राऊत यांनी दिली. वैभव हा विवाहित असून त्यांना एक मुलगा तर एक मुलगी आहे. त्याचे वडील हयात नसून आईसोबत राहतो. अचानक काल रात्री ७, साडेसातच्या सुमारास काही पोलीस वैभवच्या राहत्या घरी धाड घालण्यास आले. त्यावेळी आम्हाला काहीच जाणीव नव्हती. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांची कुमक आली. तेव्हा आम्हाला काहीतरी संशयास्पद कारवाई होत असल्याचे कळाले. त्यानंतर आम्ही सर्व गावकरी रात्रभर जागे आहोत असे हर्षद यांनी सांगितले. साईदर्शन या चार मजली इमारतीत वैभवच्या एका दुकानाच्या गाळ्यात ८ गावठी बॉम्ब सापडले आणि आम्हाला धक्काच बसला. वैभव असे करेल असे अजिबात वाटत नाही आम्ही सर्व गावकरी त्याच्या सोबत आहोत असे हर्षदने पुढे सांगितले. 

तो कट्टर गोरक्षक आहे. उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली तर त्याला खपत नसे तो कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे धाव घेत असे. मात्र काही अतिरेकी कारवाया करेल असे वाटत नाही. एटीएसने कारवाई दरम्यान त्याच्या घरच्यांना किंवा कोणत्याही गावकऱ्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप गावकरांनी केला आहे. एटीएसच्या कारवाईने मात्र भांडार आळी गावाची झोप उडवली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक