शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुलीने प्रेमविवाह केल्याने वडील संतापले; तिचे अंत्यसंस्कार, पिंडदान करत मुंडनही केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 20:10 IST

आम्ही सगळेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहोत. त्यामुळे तिने आमच्या कधीही डोळ्यांसमोर येऊ नये, असा इशारा अशी विनंतीही त्यांनी केली.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील औरैयामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वडीलांनी पोटच्या मुलीने प्रेमविवाह केल्याने मुंडन केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच मुलीच्या वडीलांसह तिच्या भावानेही मुंडन करत पिंडदान केल्याची माहिती समोर आली आहे. 

मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात मुलीच्या भावाने आत्महत्येचा प्रयत्न केला, तर वडिलांनीही विष प्राशन केले. मात्र वेळीच शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने दोघांचाही जीव वाचला. औरैयाच्या दिबियापूर शहरातून सदर प्रकरण उघडकीस आले आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीचे ती जिवंत असताना अंत्यसंस्कार केले. तसेच पिंडदान करुन मुंडन देखील केले. सदर घडलेल्या प्रकरणाने आईचीही प्रकृती बिकट आहे, तीही बेशुद्ध आहे.

सदर प्रकरणावर वडीलांचे म्हणणे आहे की, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांनी त्यांच्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, परंतु मुलीने स्वतःच्या इच्छेने प्रेमविवाह केला आणि तिच्या कुटुंबाचे काय होईल याचा विचारही केला नाही. आता आम्ही सगळेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहोत. त्यामुळे तिने आमच्या कधीही डोळ्यांसमोर येऊ नये, असा इशारा अशी विनंतीही त्यांनी केली.

वडिलांनी सांगितले की, मी मुलांप्रमाणे आपल्या मुलीला खूप शिकवले. पण आज तिने माझ्या संमतीशिवाय हा निर्णय घेतला आणि लग्न केले. माझ्यासाठी माझी मुलगी मेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मुंडन केले आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित मुलीच्या वडीलांनी दिली. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही मुलाच्या घरच्यांना घरी बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला मारहाण केली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी मान्य झाली नाही. आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपली मुलगी त्या मुलासोबत पळून गेली, असं मुलीचे वडील म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न