शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पोलीस अन् प्रशासनाच्या विरोधात कारवाई व्हावी, हाथरस पीडितेच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया

By पूनम अपराज | Updated: December 19, 2020 15:54 IST

Hathras Gangrape : पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत. 

ठळक मुद्देहाथरसच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे आणि या आरोपपत्रामध्य़े आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आला आहे.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणातील महत्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने या केसमधल्या चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. हाथरसच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे आणि या आरोपपत्रामध्य़े आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेची वकील सीमा कुशावह यांनी आजतकशी बोलताना सांगितले की, सीबीआयने ४ आरोपींवर आरोपपपत्र दाखल केले आहे, परंतु पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत. 

उत्तर प्रदेशमधल्या हाथरस गावात १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर गुपचुप अंत्यसंस्कार करण्यात आले होतं. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यानंतर ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

सीमा पुढे म्हणाल्या की, सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे आता स्पष्ट झाले आहे की हाथरसव्हे स्थानिक प्रशासन या प्रकरणात खोटा ऑनर किलिंग प्रकरण मानून बलात्कार करणार्‍या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. याप्रकरणी तेथील स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले जावे.पीडितेच्या कुटूंबाबद्दल बोलताना सीमा म्हणाल्या, "पीडितेचे कुटुंब अजूनही उच्च जातीच्या लोकांसोबत राहत आहे, त्यामुळे कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे. पण ते संरक्षण आयुष्यभर आहे काय?" जेव्हा जेव्हा सुरक्षितता वाढविली जाते, तेव्हा त्या गावात कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येते. मी अलीकडेच त्या खेड्यात गेले आणि मला तेथील लोकांकडून तणावाचे बोल ऐकायला मिळाले. आरोपीची लवकर सुटका होईल या भीतीने ते कुटुंब अस्वस्थ होते. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशadvocateवकिलMurderखूनCBIगुन्हा अन्वेषण विभाग