शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पोलीस अन् प्रशासनाच्या विरोधात कारवाई व्हावी, हाथरस पीडितेच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया

By पूनम अपराज | Updated: December 19, 2020 15:54 IST

Hathras Gangrape : पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत. 

ठळक मुद्देहाथरसच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे आणि या आरोपपत्रामध्य़े आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आला आहे.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणातील महत्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने या केसमधल्या चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. हाथरसच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे आणि या आरोपपत्रामध्य़े आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेची वकील सीमा कुशावह यांनी आजतकशी बोलताना सांगितले की, सीबीआयने ४ आरोपींवर आरोपपपत्र दाखल केले आहे, परंतु पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत. 

उत्तर प्रदेशमधल्या हाथरस गावात १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर गुपचुप अंत्यसंस्कार करण्यात आले होतं. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यानंतर ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

सीमा पुढे म्हणाल्या की, सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे आता स्पष्ट झाले आहे की हाथरसव्हे स्थानिक प्रशासन या प्रकरणात खोटा ऑनर किलिंग प्रकरण मानून बलात्कार करणार्‍या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. याप्रकरणी तेथील स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले जावे.पीडितेच्या कुटूंबाबद्दल बोलताना सीमा म्हणाल्या, "पीडितेचे कुटुंब अजूनही उच्च जातीच्या लोकांसोबत राहत आहे, त्यामुळे कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे. पण ते संरक्षण आयुष्यभर आहे काय?" जेव्हा जेव्हा सुरक्षितता वाढविली जाते, तेव्हा त्या गावात कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येते. मी अलीकडेच त्या खेड्यात गेले आणि मला तेथील लोकांकडून तणावाचे बोल ऐकायला मिळाले. आरोपीची लवकर सुटका होईल या भीतीने ते कुटुंब अस्वस्थ होते. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशadvocateवकिलMurderखूनCBIगुन्हा अन्वेषण विभाग