शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

फटाके फोडल्याने तामिळनाडूत ७ जणांना अटक; २०० हून अधिक  जणांवर गुन्हे दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:47 PM

तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली. 

नवी दिल्ली - दिवाळी सणाचा उत्साह आणि आनंद देशभरात ओसंडून वाहताना दिसत आहे. मात्र, या सणाला वेळ न पाळता फटाके फोडल्याने गालबोट लागले आहे. तामिळनाडूमध्येसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून घालून दिलेली वेळ न पाळता फटाके फोडल्याने २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना अटक करण्यात आली. 

मंगळवारी सायंकाळी ६ वाजता फटाके फोडताना आढळून आल्याने तामिळनाडू पोलिसांनी कडक पावलं उचलत हे गुन्हे दाखल केले आहेत. कारण तामिळनाडू सरकारने सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. मात्र तरी देखील वेळेबाहेर फटाके फोडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तामिळनाडू राज्यात सर्वात जास्त गुन्हे हे विल्लूपुरम जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या जिल्ह्यात ८० लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीरूधुनगर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर कोईम्बतूर येथे ३० आणि दिंडीगुलमध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमक्कल पोलिसांनी एकाला अटक केली असून तिरुनेलवेली पोलिसांनी ६ जणांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrackersफटाकेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडूArrestअटक