शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:58 IST

एकाच वयोगटातील आणि एकाच गावातील तीन तरुणी अचानक रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या.

बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या महावतपूर बिल्लौच गावातील तीन १९ ते २० वर्षीय तरुणींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दिल्लीतून सुखरूप शोधून काढले आहे. तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हे शक्य झाले. मात्र, या तिघींनीही घर सोडण्यामागे दिलेली कारणे ऐकून पोलीस अधिकारीही काही काळ विचारमग्न झाले होते; कारण या तिघींच्या समस्या आणि कहाण्या पूर्णपणे वेगळ्या होत्या.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील महावतपुर बिल्लौच हे छोटेसे गाव गेल्या २४ तासांपासून एका गूढ घटनेमुळे चिंतेत होते. एकाच वयोगटातील आणि एकाच गावातील तीन तरुणी अचानक रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या. पालकांनी शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित तीन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. आणि याच तपासात पोलीस अधिकाऱ्यांना एक धक्कादायक सत्य समोर आले.

दोघींच्या कहाणीत मैत्री आणि ताण

पोलीस क्षेत्राधिकारी नितेश प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या तीन तरुणींपैकी दोन तरुणी खूप चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबाला त्यांची ही मैत्री मान्य नव्हती. कुटुंबातील लोक वारंवार या दोघींना टोकत असत आणि त्यांच्या मैत्रीवर आक्षेप घेत त्यांना दूर राहण्याचा सल्ला देत.

नोकरीच्या शोधात होत्या दोघी 

या सततच्या टोमण्यांना आणि मानसिक दबावाला कंटाळून दोघींनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला. बाहेर जाऊन चांगली नोकरी शोधायची आणि स्वतंत्र आयुष्य जगायचे, या विचाराने त्या कोणालाही न सांगता चुपचाप घरातून निघून गेल्या होत्या.

तिसऱ्या तरुणीच्या पलायनामागे 'जबरदस्तीचे लग्न'

याच गावातील तिसऱ्या तरुणीची कहानी पूर्णपणे वेगळी होती. या तरुणीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध कुटुंबाने ६ डिसेंबर रोजी ठरवून टाकले होते. लग्नाच्या अचानक सुरू झालेल्या तयारीमुळे आणि तिच्या मताला किंमत न दिल्याने ती मानसिकरित्या खूप तणावाखाली होती. तिने विरोध करूनही कुटुंबाच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. अखेर, जबरदस्तीने होणाऱ्या या लग्नाला कंटाळून तिनेही घर सोडण्याचा निर्णय घेतला.

एकाच गावात, पण समस्या वेगवेगळ्या

या तीनही तरुणी एकाच गावच्या असल्याने त्यांना एकमेकींच्या समस्यांची कल्पना होती. मानसिक ताण, कुटुंबाचा विरोध आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची आस यामुळे त्या तिघींनीही एकत्र घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.

पोलिसांची जलद कारवाई, २४ तासांत मुली सापडल्या 

बिजनौर पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनचा कसून मागोवा घेतला. तपासासाठी तयार केलेल्या तीनही पथकांनी अत्यंत वेगाने समन्वय साधून काम केले. या जलद तपासामुळे अवघ्या २४ तासांत दिल्लीमध्ये तिन्ही तरुणींचे लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी तिघींनाही सुखरूप ताब्यात घेतले असून, त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आहे. तीनही मुली सुखरूप परतल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर, बिजनौर पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल गावामध्येही समाधान व्यक्त होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Three Girls Vanish from Same Village, Found in 24 Hours

Web Summary : Three young women from the same village disappeared but were found in Delhi within 24 hours. Family disapproval, forced marriage, and desire for independence drove their separate decisions to leave. Police swiftly located them, resolving the crisis.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्ली