शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

गतवर्षात २६ कोटींचा ऐवज चोरीला, नवी मुंबईसह पनवेलमध्ये मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:03 IST

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात मालमत्ता चोरीचे २२८० गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये एकूण २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. २०१७ च्या तुलनेत गतवर्षात घडलेले हे गुन्हे ४७८ ने अधिक आहेत.नवी मुंबईच्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांमध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळत आहे. तर इतर शहरांमधील गुन्हेगारही नवी मुंबईकडे लक्ष केंद्रित करू लागले आहेत, यामुळे सोनसाखळी चोरी, घरफोडी, लूट अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षात अशा प्रकारच्या मालमत्ताचोरीचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये दरोडा, घरफोडी, चेनचोरी यासह वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. २०१७ मध्ये अशा प्रकारचे मालमत्ताचोरीचे १८०२ गुन्हे घडले होते. मात्र, गतवर्षात त्यात ४७८ ने वाढ होऊन २२८० गुन्हे घडले आहेत. यावरून तत्कालीन पोलीस आयुक्त शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.गतवर्षात घडलेल्या या गुन्ह्यांमध्ये रात्रीच्या ३६१ व ९९ अशा एकूण ४६० घरफोडीच्या घटना घडल्या आहेत, त्यामध्ये एकूण ५ कोटी ८९ लाख २० हजार ७६६ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, तर वाहनचोरीच्या ८४३ घटनांमध्ये ९ कोटी ५१ लाख ५ हजार १७३ रुपये किमतीची वाहने चोरीला गेली आहेत. घरफोडी, चेनचोरी तसेच वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न झाले आहेत. अनेक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गतही कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही गत कालावधीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपेक्षित यश आलेले नसल्याचे एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे; परंतु गतवर्षाच्या अखेरीस संजय कुमार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर दिला. त्याशिवाय नागरिक आणि पोलीस यांच्यात निर्माण झालेली दरी भरून काढण्याचाही प्रयत्न केला आहे, तर घडलेले गुन्हे उघड करून पकडलेल्या गुन्हेगारांवर न्यायालयात दोषसिद्ध करण्याचेही प्रमाण वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रितकेले आहे.पकडलेल्या गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल जप्तीचे प्रमाण वाढविण्याची गरजगुन्हे प्रकटीकरणाच्या बाबतीत पोलीस फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, त्यामुळे मालमत्तांच्या एकूण २२८० गुन्ह्यांपैकी ८७४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या एकूण गुन्ह्यांमध्ये २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व वाहने व इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी त्यापैकी ९७४ गुन्ह्यांची उकल करून सात कोटी ९६ लाख १३ हजार ४२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. गेलेल्या मुद्देमालापैकी हस्तगत मुद्देमालाचे गतवर्षाचे प्रमाण ३० टक्के आहे.अनेकदा मुला-मुलींच्या भविष्यासाठी पालक दागिन्यांच्या स्वरूपात गुंतवणूक करून ठेवत असतात. अशातच त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यास संपूर्ण कुटुंबापुढे आर्थिक संकट निर्माण होत असते. मात्र, गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्याच्याकडून फारसा ऐवज परत मिळत नाही.चोरीच्या मालाची विल्हेवाट लावली गेलेली असते, अथवा त्याच्याकडून जप्ती मिळवण्यात पोलीस कमी पडतात. परिणामी, गुन्हा उघडकीस येऊनही संबंधितांना त्यांचा गेलेला ऐवज परत मिळत नाही, अथवा कमी प्रमाणात मिळतो.चोरीच्या मुद्देमालाची जप्ती वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी