शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

एमआयडीसीमधील 18 कामगारांना विषबाधा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 5:14 PM

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग ...

अंबरनाथ - अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीमधील व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत एकाच वेळी 18 कामगारांना विषबाधा झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र या कामगारांमधील 10 कामगारांना किरकोळ त्रस झाल्याने त्यांना उपचार करुन सोडण्यात आले तर उर्वरित आठ जणांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या कामगारांना विषबाधा झाली नसून जंतूसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. 

व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत काल सायंकाळी हा प्रकार घडला. या कंपनीत 600 कामगार काम करित असून त्यातील 18 कामगारांना मळमळने, उलटय़ा होणे असा त्रस जाणवत होता. त्यातील 10 कामगारांवर कारखान्यातील डॉक्टरांनीच उपचार करुन त्यांना घरी सोडले. तर उर्वरित 8 कामगारांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्या कामगारांना कशामुळे त्रास झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दुपारच्या जेवणातून हा त्रास झाल्याची शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. मात्र, 600 कामगारांपैकी अवघ्या 18 जणांना त्रास झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र, कामगारांना झालेल्या त्रसाबाबत कंपनी स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी देखील चौकशी सुरु केली आहे. कामगारांना नेमका जेवणातून त्रास झाला की कंपनीतील पाण्यातून त्रास झाला हे तपासण्यात येत आहे. कंपनीतील जेवण आणि पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. 

ज्या कामगारांवर उपचार सुरु आहेत. त्यातील यागेश डोळे, पुरुषोत्तम पाटील, हर्षद गायकवाड, आनंद चिडे, रोहदास डायरे, आशुतोष पॉल, नरेंद्र राऊत आणि संग्राम नायर यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीचे वरिष्ठ संचालक विपीन रत्नपारखी  आणि संचालक मंगेश सावंत यांनी देखील कामगारांच्या प्रकृतीची चौकशी केली असून या कामगारांवर कंपनीमार्फत उपचार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही केली जात असल्याचे कंपनीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfood poisoningअन्नातून विषबाधाambernathअंबरनाथ