शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
4
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
5
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
6
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
7
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
8
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
9
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
10
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
11
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
12
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
13
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
14
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
15
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
16
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
17
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
18
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
19
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
20
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:18 IST

एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.

करवा चौथच्या रात्री विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतानाच अलीगढमध्ये एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच हादरवून टाकलं. नववधूंनी करवा चौथचे व्रत केलं, पतीची आरती केली आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांना विषारी पदार्थ खाऊ घालून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.

सासनी गेट पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली, जिथे आतापर्यंत चार एफआयआर दाखल झाले आहेत आणि पोलिसांनी एका टोळीने हे काम केल्याचं म्हटलं आहे. या सर्व "वधू" बिहार आणि झारखंडमधून आणल्या गेल्या होत्या आणि दलालांनी लग्न करू इच्छिणाऱ्या कुटुंबांमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं होतं. या दलालांना लग्नासाठी ८०,००० ते १.५ लाख रुपये देण्यात आले होते.

आधी सासू-सासऱ्यांची मनं जिंकली अन् नंतर...

चौकशीत असं दिसून आलं की, लग्नानंतर सर्व बारा वधूंनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनं मोठ्या प्रेमाने जिंकली होती. या सर्वांनी करवा चौथचा उपवास केला, घर सजवलं, मेंदी लावली आणि नवऱ्याला ओवाळलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वधूंनी स्वतः जेवण तयार केलं आणि जेवणात विषारी पदार्थ टाकला. कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडताच बॅगा भरल्या आणि पळून गेल्या.

कुटुंबीयांना मोठा धक्का

सकाळी जेव्हा कुटुंबीय शुद्धीवर आले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कपाट उघडं होतं, लॉकर रिकामं होतं आणि नववधू घरात नव्हत्या. या लग्नांमध्ये दलालांची महत्त्वाची भूमिका होती. बहुतेक लग्न तीन ते चार दलालांच्या नेटवर्कद्वारे आयोजित केलं गेलं होतं. जेव्हा मुली पळून गेल्या, तेव्हा पहिला कॉल दलालांच्या नंबरवर लावण्यात आला, परंतु सर्व नंबर बंद होते किंवा कॉलरने उत्तर दिलं नाही.

१२ कुटुंबांची ३० लाखांची फसवणूक

कुटुंबीयांना यानंतर आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, या १२ नववधूंनी ३० लाख रुपयांहून अधिक पैसे लुटले आहेत. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र या लग्नाची आणि नववधू पळून गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Brides flee with loot, grooms in coma: Aligarh fraud!

Web Summary : In Aligarh, twelve brides fled after Karwa Chauth celebrations, drugging families and stealing valuables. The brides, from Bihar and Jharkhand, were part of a marriage scam, leaving families defrauded of over 3 million rupees. Police are investigating the organized crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश