शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आरएसएस शाखेत शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकविला जातो, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:00 IST

दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसणे म्हणजे हिंदुत्व, अशी हिंदुत्वाची व्याख्या आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास शिकविला जातो, खोटा इतिहास शिकविणाऱ्यांना तेव्हाच ठेचले असते तर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याची हिंमत झाली नसती, अशी सडेतोड टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर केली.

औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वतीने रविवारी रात्री टीव्ही सेंटर येथे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला संपर्कप्रमुख आ. मनीषा कायंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदू घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडी शहरप्रमुख प्रतिभा जगताप, सुनीता देव यांची उपस्थिती होती. फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधारे यांना ऐकण्यासाठी टीव्ही सेंटर येथील मैदानावर मोठी गर्दी होती.

अंधारे म्हणाल्या की, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि वाढत्या महागाईवर विरोधकांनी आणि सामान्य जनतेने प्रश्न विचारू नयेत, यासाठी भाजपकडून हिंदुत्वाचे, धर्माचे भावनिक राजकारण करून सत्तेच्या पोळ्या भाजल्या जातात. दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसणे म्हणजे हिंदुत्व, अशी हिंदुत्वाची व्याख्या आहे. विदेशी पाहुणे भारतात येतात तेव्हा मोदी त्यांना घेऊन एकदाही सावरकरांचे गाव असलेल्या भगूरला नेत नाहीत, तर महात्मा गांधींच्या आश्रमात नेतात. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रद्रोही धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला. अंबादास दानवे म्हणाले, सिडको, हडकोच्या फ्री होल्डचा प्रश्न मार्गी लावल्याचे एका आमदाराने होर्डिंग लावले होते. मात्र ते सर्व खोटं होते. राज्यात आम्ही प्रयत्न केले; परंतु नगरविकास मंत्र्यांनी त्यात खोडा घातला. तनवाणी यांनी ही गर्दी लक्षात घेता शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. खैरे, घोसाळकर, आ. कायंदे यांचीही भाषणे झाली.

कोश्यारी राज्यपाल कमी आणि भाजपचा कार्यकर्ताच अधिकराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आजपर्यंतची कारकीर्द राज्यपाल कमी आणि भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ताच जास्त अशी आहे, स्त्री शिक्षणाचा आदर्श ठेवणाऱ्या क्रांतिज्योती जोतिबा फुले यांच्याबद्दल वाईट वक्तव्य त्यांनी केले होते. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही ते बोलले.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ