शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:43 IST

राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा लाक्षणिक संप : एक दिवसाची सामूहिक रजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा घेत संप पुकारला. जिल्ह्यातील १३ नगर परिषद आणि ६ नगर पंचायतीच्या सर्वच कर्मचाºयांनी एका दिवसाची सामूहिक रजा घेतल्याने नगर परिषद व पंचायतीचे कामकाज ठप्प झाले. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाºयांनी पालिकेसमोर धरणे देत शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध केला. बुधवारी सामूहिक रजा आणि १० ते १४ आॅगस्टपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. त्यानंतरही शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय नगर परिषद मुख्याधिकारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीने घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील उमरेड, रामटेक, काटोल, कामठी, मोवाड, सावनेर, खापा, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, मौदा, वानाडोंगरी, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, कन्हान, महादुला आदी नगर परिषद, नगर पंचायतमधील कर्मचाºयांनी बुधवारी या आंदोलनात सहभाग घेत लाक्षणिक संप पुकारला.हिंगणा नगर पंचायत तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजेवर गेल्याने दोन्ही कार्यालय बुधवारी दिवसभर बंद होते. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. या आंदोलनात हिंगणा नगरपंचायतचे गणेश पात्रे, अमोल घोडमारे, संजय माहुरे, चैतन्य डाहे तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे किरण रोगे, हरिश्चंद्र बारंगे, देवेंद्र शेंडे, देवीदास बेलेकर, उमेंद्र किन्हेकर, कुमुद सोनटक्के, लीलाधर डाखळे, सोनाली राऊत, सोनाली सोमनाथे आदी सहभागी झाले होते.वाडीत नगराध्यक्षांना निवेदनवाडी नगर परिषदेच्या कर्मचाºयांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारून आपल्या प्रलंबित मागण्यासंदर्भात नगराध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्याकडे निवेदन सोपविले. यावेळी कर्मचाºयांनी मुख्याधिकारी राजेश भगत, भद्रावतीचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या उपस्थितीत पालिकेसमोर धरणे दिली. यावेळी उपमुख्याधिकारी आकाश सहारे, संघटन अध्यक्ष रमेश इखनकर, लेखा अधिकारी शरद करवाडे, प्रणाली दुधबळे, अभियंता प्रमोद माने, अश्वलेषा भगत, बी. पी. निकाजू, योगेश जहागीरदार, धनंजय गोतमारे, अविनाश चौधरी, कपील डाफे, लक्ष्मण ढोरे, रमेश इखनकर, कमलेश तिजारे , संदीप अढाऊ, भारत ढोके, रवींद्र रडके, एम. एम. वानखडे आदी उपस्थित होते. शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कर्मचाºयांनी दिला.