शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतीच पुनर्भरणाशिवाय

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : पुनर्भरणाच्या चळवळीत प्रशासकीय उदासीनता दिसून येत असून, शहरातील अपवाद वगळता एकाही शासकीय इमारतीवर हा प्रकल्प उभारलेला नाही.

परभणी : पुनर्भरणाच्या चळवळीत प्रशासकीय उदासीनता दिसून येत असून, शहरातील अपवाद वगळता एकाही शासकीय इमारतीवर हा प्रकल्प उभारलेला नाही. एकीकडे पुनर्भरणासाठी जनजागरण केले जात असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणेतील उदासीनता चळवळीसाठी गतिरोधक ठरत आहे.
पाणी समस्या ही आता कुठल्या एका गावापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्याची ही समस्या झाली आहे. दरवर्षी पाणीटंचाई गाजत असते. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला ही टंचाई निवारण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. लाखो रुपयांचा निधी पाण्यासाठी वापरला जातो. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनरभरण हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी शासनातर्फेही वेळोवेळी जनजागरण केले जाते. परंतु जनजागरण करीत असताना शासकीय कार्यालयांच्या इमारती मात्र या प्रकल्पाविनाच उभारल्याचे समोर येत आहे. परभणी शहराचा विचार करता शहरामध्ये ६० ते ७० शासकीय कार्यालये आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय या शासकीय कार्यालयांबरोबरच विविध निमशासकीय संस्था, बँक, शाळांच्या इमारती आहेत. यापैकी बहुतांश इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुनर्भरणाकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचेच दिसत आहे.
नव्याने इमारत बांधकाम करावयाचे झाल्यास बांधकाम परवानगी घेताना पुनर्भरण प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्यानंतरच महानगरपालिका बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी देते. परंतु अद्यापपर्यंत एकाही शासकीय कार्यालयाने पुनर्भरण झाल्याचे मनपाला कळविले नाही. प्रशासकीय स्तरावरुन गती मिळाल्यास पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास वेळ लागणार नाही. (प्रतिनिधी)
मनपाकडे नाही माहिती
शहरातील किती शासकीय इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले आहे, याची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. परंतु आम्ही बांधकाम परवाना देताना पुनर्भरण करुन घेणे बंधनकारक करतो, असे सांगण्यात आले. आणखी विशेष बाब म्हणजे महानगरपालिकेच्या इमारतीवरही पुनर्भरण प्रकल्प उभारलेला नाही. यावरुन याविषयीची उदासीनता दिसून येते.
पोलिस अधीक्षक कार्यालयाचा अपवाद
परभणी शहरात पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत नव्याने उभारली आहे. केवळ पोलिस अधीक्षक कार्यालयानेच महानगरपालिकेकडे बांधकाम पूर्ण झाल्याचे पत्र दिले असून, या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.
जलमित्रांचे प्रयत्न
काही दिवसांपूर्वी शहरात जलमित्र संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून जलप्रेमी नागरिक एकत्र आले असून, त्यांनी शहरात पुनरभरण करण्याविषयी जनजागृती सुरू केली आहे.विशेष म्हणजे, घरोघरी फिरुन पुनर्भरण करण्याचा आग्रह केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक निवासी इमारतींवर आता पुनर्भरण प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे दिसून येत आहे. या जलमित्रांना प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्यास या चळवळीला गती मिळण्यास वेळ लागणार नाही.