शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

वन्यजीवही ठरले दुष्काळाचे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 7:39 PM

वन्यप्राण्यांची पाणी, अन्नासाठी शहराकडे धाव

ठळक मुद्देआजार किंवा इतर प्राण्यांची शिकारबहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : जंगल क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राण्यांना पाणी आणि अन्न मिळेनासे झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत. औरंगाबाद परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सहा महिन्यांत हरिण, काळवीट, रानडुक्कर, बिबट्या व नीलगाय आदी १९ वन्यप्राण्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभाग या प्राण्याच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे सांगत असले तरी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू मानवी हल्ल्यांनी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद वनविभागांर्तगत नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. वनविभागात पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. असे असले तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका या प्राण्यांनाही बसला आहे. जंगलांमध्ये या प्राण्यांना अन्न व पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. यातूनच प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यातून मानवी हल्ल्यांमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचे काही घटनांवरुन दिसून येत आहे. 

यंदा जानेवारी ते मे या कालावधीत वनक्षेत्रातील वन्यजीवांवर हल्ले किंवा अपघात झालेले तसेच नैसर्गिकरीत्या मृत झालेले वन्यजीव आढळून आले आहेत. या प्राण्याच्या मृत्यूचे पंचनामे करून स्थानिक पातळीवरून चौकशी सुरू असल्याचे वनविभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या घटनांची चौकशी सुरू झाली; पण पुढे काही झाले नाही. रोजच्या धावपळीच्या दैनंदिनीतून विरंगुळा म्हणून काही क्षण निवांत घालविण्यासाठी तारांकित वसाहत व टेकड्यांवर घरे बांधण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. यातूनच निसर्गाचा समतोल ढसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासह वन्यजीवांचे रक्षण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.   

आजार किंवा इतर प्राण्यांची शिकारमुख्य वनसंरक्षक पी.के. महाजन म्हणाले की, विभागातील काही जिल्ह्यांत ज्या वन्यजीवांचे मृतदेह आढळून आले आहेत, त्यांची त्या स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यात कोणी दोषी आढळल्यास वन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.  नैसर्गिक मृत्यू हा आजार अथवा शरीरातील पाणी कमी झाल्यानेही होऊ शकतो. चौकशीअंती ते समजू शकणार आहे. 

टॅग्स :forestजंगलdroughtदुष्काळDeathमृत्यू