शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सगळेच तानसेन कशाला ? कानसेनही तितकेचे महत्त्वाचे; ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:43 IST

लोकमत मुलाखत : जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओखळ. अशा या विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गंधर्व संगीत महोत्सवा’निमित्त शहरात आल्या होत्या. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी मुक्त संवाद साधला.

ठळक मुद्दे जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या ओळखल्या जातातजाणकार रसिकांची मांदियाळी हवी. शास्त्रीय संगीत ऐकणारे आणि ते अनुभवणारे यात फरक असतो. ते अनुभवणारे कानसेन निर्माण व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा.‘क्लासमध्ये संगीतओळख केली जाऊ शकते. परंतु, खरी संगीत साधना तेथे होऊ शकत नाही. त्यासाठी गुरु-शिष्य पंरपरेला पर्याय नाही.

- मयूर देवकर  

औरंगाबाद : बालपणापासून आजी आणि आईने केलेल्या संगीत संस्कारांची माया एवढी गाढ होती की, अश्विनीतार्इंना सुरांना श्वासापासून वेगळे करणे शक्य नव्हते. तानपु-याशी जुळलेली नाळ, त्याचा आजीवन स्नेह त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला. जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओखळ. अशा या विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गंधर्व संगीत महोत्सवा’निमित्त सोमवारी शहरात आल्या होत्या. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी मुक्त संवाद साधला.  

औरंगाबादमध्ये मी यापूर्वीही मैफली केल्या. या शहरात जाणकार रसिकांची मोठी परंपरा आहे, असे प्रांजळ मत व्यक्त करून त्यांनी चर्चेला सुरुवात केली. जगभरातील प्रतिष्ठेच्या संगीत महोत्सवात सादरीकरण केलेल्या अश्विनीतार्इंसाठी शहर अथवा जागा महत्त्वाची नाही. जाणकार रसिकांची मांदियाळी हवी. शास्त्रीय संगीत ऐकणारे आणि ते अनुभवणारे यात फरक असतो. ते अनुभवणारे कानसेन निर्माण व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा.  चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो आणि इंटरनेटमुळे शास्त्रीय संगताचा प्रचार होण्यास मदत मिळाली. ‘ग्लॅमर’सदृश्य लोकप्रियता दिसू लागली. परंतु, शास्त्रीय संगीताला अद्यापही ‘ग्लॅमर’ आले नसल्याचे त्या मानतात. ‘हल्ली माध्यमांतून शास्त्रीय संगीताची प्रसिद्धी वाढली आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जागृती वाढत आहे. अभिरुचीसंपन्न नसली तरी किमान लोकांना तोंड ओळख तरी होतेय. रिअ‍ॅलिटी शोमधून नवीन गायकांना संधी मिळतेय हीदेखील चांगली गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.  

सिनेमा किंवा रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहिले म्हणून ‘ग्लॅमर’च्या आशेने या क्षेत्राकडे वळणा-या नवगायक व त्यांचा पालकांना अश्विनीताई एक सल्ला देतात. ‘अनेक वाहिन्यांवर चालणा-या संगीत कार्यक्रमांतून ‘महागायक’ तयार केले जातात. पण, गायक असे तयार केले जाऊ शकतात का? संगीत हे असे क्षेत्र आहे जेथे प्रत्येकाला आपली वाट स्वत: निर्माण करावी लागते. टीव्ही शोमधून बाहेर पडणा-या गायकांमध्ये ती क्षमता, ती जाणीव असते का याचा विचार केला पाहिजे.  

यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ नाही!  लहानपणापासूनच अश्विनीतार्इंचा गायनप्रवास सुरु झाला होता. नारायणराव दातार आणि नंतर आईच्या कडक शिस्तीत त्या तयार झाल्या. कठोर रियाज आणि संपूर्ण समर्पणातून कमावलेली गायनकला त्यांना अशी सहजासहजी नाही मिळाली. एक रात्रीतून त्या ‘महागायिका’ बनल्या नाहीत. आज त्यांचे जे स्थान आहे, त्यांचा जो मानसन्मान आहे तो मिळवण्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही. त्या म्हणतात, ‘कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ असूच शकत नाही. त्यासाठी स्वत:ला अपार कष्ट करावे लागतात. 

आजकाल ‘संगीत विद्यालय’ आणि ‘संगीत क्लास’ची संख्या कैकपटीने वाढली आहे. त्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘क्लासमध्ये संगीतओळख केली जाऊ शकते. परंतु, खरी संगीत साधना तेथे होऊ शकत नाही. त्यासाठी गुरु-शिष्य पंरपरेला पर्याय नाही. वर्षानुवर्षे गुरुकडून संगीताचे ज्ञना मिळवणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणे गरजेचे असते.’ यावेळी आयोजक प्राचार्या डॉ. रोहिणी कुलकर्णी पांढरे म्हणाल्या की, मुलांना अशा मोठ्या गायकांना ऐकण्याची संधी मिळावी म्हणूनच गेल्या वर्षीपासून हा महोत्सव आयोजित केला जातो. 

या क्षेत्रातील गायक केवळ गायनावर भर देतात. पंरतु, शास्त्रीय संगीताचा इतिहास, त्याचे साहित्य, त्याचे शास्त्र, त्याचा अभ्यास, त्याचे सौंदर्यशास्त्र याविषयी संशोधन किंवा लिखाण करणारे गायक फार कमी आहेत. अश्विनीताईं मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी स्व-रचित बंदिशीचे ‘रागरचनांजली’ हे दोन भागांचे पुस्तक लिहिले आहे.  त्या म्हणतात, ‘संगीत क्षेत्रात येणाºया बहुतांश कलाकारांना मंचाचे आकर्षण असते. परंतु, संगीत शिकणा-या प्रत्येकानेच गायक होण्याची गरज नाही. सगळेच गायक झाले तर ऐकणार कोण? प्रत्येकामध्ये सादरीकरणाची क्षमता असेलच असे नाही. त्यांनी निराश न होता या क्षेत्रातील इतर पर्यायांचा विचार करावा. ते उत्तम रसिक होऊ शकतात. संशोधक, अभ्यासक, लेखक म्हणून शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे सगळ्यांनीच तानेसन होण्याची गरज नाही. कानसेन होणेदेखील तेवढेच गरजेच आहे.’

टॅग्स :musicसंगीतAurangabadऔरंगाबाद