शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाला कोणी लावला सुरुंग? नागरिक अनुभवतात दररोज वाहतूककोंडी

By मुजीब देवणीकर | Updated: July 27, 2022 12:38 IST

निधी उपलब्ध, भूसंपादन नाही; न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्षात कामाचा मार्ग अद्याप शासकीय यंत्रणांना सापडला नाही.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी एक दशकापासून सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्षात कामाचा मार्ग अद्याप शासकीय यंत्रणांना सापडला नाही. त्यामुळे सातारा-देवळाई भागातील हजारो नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी मनपा, राज्यशासन आणि रेल्वे यांच्यावर न्यायालयाने जबाबदारी निश्चित केली आहे. औरंगाबाद खंडपीठात दाखल ९६/२०१३ या याचिकेत न्यायालयाने संबंधित शासकीय कार्यालयांना भुयारी मार्गाबाबत आदेश दिले आहेत. त्यानंतरही महापालिका, जिल्हा प्रशासक, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी एकमेकांकडे अंगुली निर्देश करीत आहेत.

सातारा-देवळाई परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शिवाजीनगर येथील रेल्वे फाटक क्रमांक ५५ येथे अगोदर उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प शक्य नसल्यामुळे तेथे भुयारी मार्ग यासंबंधी चाचपणी केली. हा पर्याय योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला. भुयारी मार्गासाठी ३८.५५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे शासन स्तरावर सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाटा २२ कोटी, रेल्वेने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १६ कोटी रुपयांची तरतूद केली. शिवाजीनगर परिसर महापालिकेच्या हद्दीत येत असल्याने महापालिकेचा ६ कोटींचा वाटाही शासनाने भरावा, असे न्यायालयाने सूचित केले होते. राज्यशासनानेही हमी भरली होती.

भूसंपादनच झाले नाहीसातारा हद्दीतील ग. नं. १२४/२ व १३१ मधील २४ मीटर रुंद रस्त्यासाठी संपादनाची गरज आहे. विशेष भूसंपादन अधिकारी वि. भा. दहे यांनी प्रस्ताव पाठविला. मात्र, आजपर्यंत प्रत्यक्षात भूसंपादन झाले नाही. महापालिकेमार्फत भूसंपादनासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना पुढील प्रक्रियेसाठी एक कोटी ८१ लाख ३४ हजार रुपये वर्ग केले. प्रस्ताव एका विभागाकडून दुसऱ्या विभागात जातोय एवढेच.

दररोज वाहतूक कोंडीसातारा-देवळाईसह शिवाजीनगर भागात राहणाऱ्या नागरिकांना दररोज सकाळी, सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अधून-मधून या ठिकाणी लहान-मोठे अपघातही होत आहेत. मोठी वाहने रेल्वे फाटकाच्या पाईपवर आदळत आहेत. मागील आठवड्यात तर गेट बंद केल्यानंतर चारचाकी वाहनच रेल्वे ट्रॅकवर अडकले होते.

दोन वर्षांची प्रक्रिया चार महिन्यांतभूसंपादन कायद्यानुसार चालणारी प्रक्रिया वर्षानुवर्षे चालते. शिवाजीनगर येथील भूसंपादनाला किमान दोन वर्षे लागली असती. ही प्रक्रिया अवघ्या चार महिन्यांवर आणली आहे. सध्या कलम १५ नुसार प्रक्रिया सुरू आहे. कलम १९ मधील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ३ ते ४ महिने लागतील. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकते.- विश्वनाथ दहे, विशेष भूसंपादन अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीrailwayरेल्वे