शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

औरंगाबादमध्ये गस्तीवरील पोलीस गेले कोठे; गुन्हेगारांचे वाढत आहे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 6:10 PM

गतवर्षी चार्ली पथक बंद करण्यात आले आणि शहरातील रस्त्यावरील गस्तच गायब झाल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले

औरंगाबाद: पोलिसांची गस्त असेल तर, चोऱ्या घरफोड्यासोबत रस्त्यावर होणारे चाकूहल्ले, लुटमार आणि छेडछाड सारखी गुन्ह्यांना वचक बसतो. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ली पोलिसांची स्वतंत्र गस्त सुरू केली होती. गतवर्षी चार्ली पथक बंद करण्यात आले आणि शहरातील रस्त्यावरील गस्तच गायब झाल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  

एक पोलीस हजार नागरीकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा असतो, असे म्हटल्या जाते. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या धाकामुळे गुन्हेगारच त्यांना पाहुन आपला रस्ता बदलतो. पोलिसांची गस्त जोरदार असेल तर रोडरोमिओंकडून महाविद्यालयीन तरूणी, शाळकरी मुलींची होणारी छेडछाडीवर नियंत्रण येते. याशिवाय चोऱ्या,घरफोड्या, लुटमार आणि गल्लीबोळात दादागिरी करणाऱ्यांवरही चांगलाच वचक बसतो. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिसांची प्रभावी गस्त व्हावी,यासाठी त्यांनी गस्तीवरील पोलिसांची सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली होती. परिणामी गस्तीच्या बाबतीत कामचुकारपणे करणे कोणालाही जमत नव्हते. संजय कुमार यांच्यानंतर राजेंद्र सिंह हे रूजू झाले. त्यांच्या कालावधीत नादुरूस्त झालेली जीपीएस यंत्रणा दुरूस्त करण्यात आली नाही. आणि कामचुकार लोकांचे चांगलेच फावले. त्यानंतर अमितेश कुमार हे रूजू झाले.

अमितेश कुमार यांनी लगेच शहरातील गस्तीसाठी चार्ली पथक स्थापन केले. चार्ली पोलीस दुचाकीने शहरात गस्त करीत होते. यासोबतच त्यांनी वातानुकुलीत  पीसीआर मोबाईलमार्फत गस्त सुरू केली. चार्लीचे नियंत्रण पोलीस आयुक्तालयातून होत यामुळे ही गस्त अत्यंत प्रभावी ठरली. अमितेश कुमार यांच्या बदलीनंतर यशस्वी यादव रुजू झाले. यादव यांनी चार्ली बरखास्त करून मोबाईल बेस्ड गस्त सुरू केली होती. गस्त केल्याचे दाखविण्यासाठी कामचुकार पोलीस त्यांचा मोबाईल दुसऱ्याकडे द्यायचे असे किस्सेही आता ऐकायला मिळत आहे. विद्यमान पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीट मार्शलमार्फत गस्त पुन्हा सुरू केली. बीट हवालदाराला गस्तीसोबत त्याच्या बीटमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे कामही सोपविले जाते. यामुळे तपास करण्यात व्यग्र होणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे गस्त करू शकत नाही. परिणामी गस्तीवरील पोलीस रस्त्यावर दिसत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद