शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कुठे हरवले रक्ताचे नाते? वृद्धाश्रमातील १८१ आईबाबांकडे पोटच्या गोळ्याचा मृत्यूनंतरही कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:43 IST

शेकडो आई-बाबांनी मुलांच्या आठवणीतच मिटले डोळे

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : इटुकल्या हाताने बाबांचे बोट धरून चालताना-खेळताना ती बऱ्याचदा धडपडायची, रडायला लागायची, तेव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय ती शांत होत नसे. ती ६ महिन्यांची असताना आई हे जग सोडून गेली. आईची मायाही त्यांनीच लावली. मुलीसाठी आयुष्यभर लग्न केले नाही आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी मुलगी अंत्यसंस्कारालाही आली नाही. हे एकच उदाहरण नव्हे, तर असे शेकडो अनुभव वृद्धाश्रम चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वृद्धाश्रमात आजवर अशा १८१ वृद्धांचा मृत्यू झाला ज्यांना त्यांची मुले शेवटी पाहायला, भेटायलाही आली नाहीत. सुशिक्षित, उच्चपदस्थ मुलांचाही यात समावेश आहे, हीच खरी शोकांतिका.

मुलांसाठी झिजले...जालन्यातील एक आजोबा ज्यांनी सायकलवर कपडे विकून दोन्ही मुलांना शिक्षक केले. सतत सायकल चालवल्यामुळे त्यांच्या पाठीत अक्षरश: बाक आला. त्यांच्या उतारवयात मधुमेहामुळे वडिलांना जास्त खायला लागते या कारणामुळे मुलांनी त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात आणून सोडले. वृद्धाश्रमात आणल्यानंतरही येथील कर्मचाऱ्यांना मुलांनी वडिलांना कमी जेवण देण्यास सांगितले, जेणेकरून त्यांचा लवकर मृत्यू होईल. यावर कर्मचाऱ्याने त्यांची खरडपट्टी काढल्यानंतर ते खजील झाले. ५ वर्षांनी आजोबा गेले. त्यापूर्वी त्यांनी आपले शेवटचे विधी मूळ गावी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती; पण मुलांनी यालाही नकार दिला. शेवटी लोकलज्जेस्तव ते स्मशानभूमीत आले. मात्र, अंत्यसंस्कार सोडून नातेवाइकांसोबत भांडणातच ते गुंतले. शेवटचे संस्कार वृद्धाश्रमानेच केले.

शेवटी एकटेचआस्था फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात राहणारे एक आजोबा ज्यांना मुलगी आणि पत्नीने घर स्वत:च्या नावावर करून घेत हाकलून लावले. कुठे-कुठे भटकल्यानंतर कोण्या एका नातेवाइकाच्या मदतीने ते वृद्धाश्रमात राहायला आले. घरासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. अनेक वर्षे प्रकरण चालले. मात्र, शेवटी निकालाच्या आधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे शेवटचे दर्शन घ्यायलादेखील मुलगी, पत्नी आल्या नाहीत.

अशी आहे संख्यामातोश्री वृद्धाश्रम : १७० (मागील ३० वर्षांत)कृपाळू वृद्धाश्रम : ०२ ( मागील ३ वर्षांत)आधार वृद्धाश्रम : ०३ ( मागील ८ वर्षांत)माणुसकी वृद्धाश्रम : ०३ ( मागील ३ वर्षांत)आस्था वृद्धाश्रम : ०३ ( मागील १० वर्षांत)एकूण- १८१

आपले वडील किंवा आई यांचा मृत्यू झालाय हे आम्ही लगेचच मुलांना कळवतो. अनेकदा ते येत नाहीत, त्यातल्या त्यात जे येतात ते हातही लावत नाहीत. नाकाला फडके बांधून लांब उभे राहतात.-सागर पागोरे, मातोश्री वृद्धाश्रम

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक