शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्टार्टअपला पाठबळ देणारे विद्यापीठ ‘ग्लोबल’ होणार कधी

By विजय सरवदे | Updated: August 23, 2022 18:43 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६४ वा वर्धापन दिन

- विजय सरवदेऔरंगाबाद : बघता बघता विद्यापीठाने ६४ वर्षे पूर्ण केली. दरम्यान, अध्यापन आणि संशोधनाच्या प्रक्रियेत गुणवत्ता व सामाजिक बांधीलकी हे ब्रीद जोपासत विद्यापीठाने राष्ट्र निर्मितीत योगदान देणारे विद्यार्थी, संशोधक घडविण्याचा प्रयत्न केला. यंदा नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कअंतर्गत देशातील शंभर विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाला ८३ वा रँक मिळाला असून, नॅकचे ‘अ’ दर्जाचे मानांकन आणि जवळपास १५ पेटंट मिळविले असून, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षणात या विद्यापीठाचे अनेक अध्यापक टॉपर ठरले आहेत.

सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या इमारतीत विद्यापीठाचे प्रशासन आणि अध्यापनाचे कार्य चालायचे. नंतर बुद्धलेणीलगत जवळपास ७५० एकरांत विद्यापीठाची प्रशस्त प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन, ग्रंथालय व विभागनिहाय इमारती आकाराला आल्या. प्रामुख्याने मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे विद्यापीठ कार्य करीत असले, तरी आज या विद्यापीठात ३० ते ४० विदेशी मुले शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने शैक्षणिक, भौतिक प्रगती साधली असून, या विद्यापीठाला युरोपियन युनियन व अन्य राष्ट्रांकडून मोठमोठे संशोधन प्रोजेक्ट मिळाले आहेत. स्पेनने विद्यापीठासोबत करार करून येथे क्वॉलिटी ॲशुरन्समध्ये गती घेण्यासाठी प्रोजेक्ट तर दिलेच, याशिवाय येथे लॅबही उभारली. त्यासाठी लाखो रुपयांची उपकरणे दिली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबादेत १९५० ला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. तेव्हा त्यांनी इथे विद्यापीठ असावे, अशी भावना व्यक्त केली होती. अखेर २३ ऑगस्ट १९५८ रोजी त्याला मूर्त रूप मिळाले आणि तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ आणि आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यान्वित झाले. पुढे या विद्यापीठाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव मिळावे म्हणून १९७७-७८ मध्ये मागणी पुढे आली. या मागणीला विरोध वाढला. मराठवाड्यात दंगली उसळल्या. नामांतराच्या लढ्यात अनेकांनी प्राणाची आहुती दिली. तब्बल १७ वर्षांनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’, असा नामविस्तार झाला आणि नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली.

विद्यापीठाने परिसरातील, तसेच सर्व महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागांसाठी ‘चाॅइस बेस्ड क्रेडिट सिस्टम’ सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत नेट-सेट व जेआरएफ फेलोशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या पुढे गेली आहे. अलीकडच्या काही वर्षांत या विद्यापीठाने सर्वांगीण प्रगती साधली असली, तरी विद्यापीठातील अनेक विभागांत अध्यापकांची पदे रिक्त आहेत. अनेक जुणेजाणतेे अध्यापक सेवानिवृत्त होत आहेत. संशोधनात होत असलेल्या कॉपीपेस्ट संस्कृतीला आळा घालून या परिसरात शैक्षणिक व संशोधन संस्कृती कायम जपण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत. येथे दर्जेदार, समाजोपयोगी संशोधन व्हावे. अर्थात, विद्यापीठाला वैश्विक दर्जाची स्पर्धा करावी लागणार आहे. एका अर्थाने विद्यापीठाने आता ग्लोबल विद्यापीठाच्या दृष्टीने वाटचाल सुरू करावी, अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.विद्यापीठाची ठळक वैशिष्ट्य- विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ४०० हून अधिक महाविद्यालये संलग्नित असून, साडेतीन ते पावणेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.- देशातील अग्रगण्य ग्रंथालयांपैकी विद्यापीठातील ग्रंथालय गणले जाते. ग्रंथालयात पावणेचार लाख ग्रंथसंपदा असून, जवळपास ५ हजार दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक थेसिस डेटाबेस, ग्रंथालय संगणकीकरण, ई-लायब्ररी, स्मार्ट कार्ड, सीडी-डीव्हीडी लायब्ररी, सुसज्य वाचनकक्ष, रिमोट ॲक्सेस, वेबकॅफे मॅनेजमेंट आदींनी हे ग्रंथालय परिपूर्ण आहे.- विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्टार्टअपला पाठबळ दिले जात आहे. दोन वर्षांत या सेंटरमार्फत ४३ स्टार्टअप सुरू झाले आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र