शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा दुरुस्तीचे वय काय? जिल्हाधिकाऱ्यांचा सवाल

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

औरंगाबाद : ‘दुरुस्तीसाठी वर्गखोल्यांचे वय काय?’ असा प्रश्न शाळा खोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता

औरंगाबाद : ‘दुरुस्तीसाठी वर्गखोल्यांचे वय काय?’ असा प्रश्न शाळा खोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सवालावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिक्षण समितीच्या सोमवारी (दि. २) झालेल्या बैठकीत करण्यात आला; परंतु वर्गखोल्यांचे निश्चित वयोमान ठरविण्यात समितीला यश आले नसले तरी किमान काळ््या मातीत बांधलेल्या इमारती निर्धारित ५० वर्षाअगोदरच खचल्यामुळे त्या शाळा पाडण्याची परवानगी समितीने मागितली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. तीत अनेक विषयांवर चर्चा झाली. विशेषत: कोणत्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, ती किती वर्षांनी करावी आणि वर्गखोल्या दुरुस्तीचे नेमके वय काय असावे यावर बराच खल झाला. सन २०१२ मध्ये वर्गखोल्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. ५ कोटी रुपयांचा निधी असताना तब्बल ९ कोटी रुपयांच्या दुरुस्त्या हाती घेण्यात आल्या होत्या. त्यात अनेक गैरव्यवहार झाले. त्याच त्या शाळा खोल्यांची वारंवार दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेता शाळा दुरुस्तीसाठी निधी मागणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी शाळांच्या दुरुस्तीचे वय ठरविण्याचा सल्ला देऊन निरुत्तर केले होते. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकीतील चर्चा शिक्षण समितीत उपस्थित झाली. सभापती तांबे म्हणाले, नव्या खोल्या बांधल्यानंतर त्यांचे शासकीय आयुर्मान ५० वर्षे असते; परंतु जिल्ह्यात अनेक शाळा काळ््या मातीत बांधलेल्या आहेत. काळ््या मातीतील इमारती लवकर खचतात. त्यामुळे या शाळा लवकर दुरुस्तीला येतात.ही आपली मुख्य अडचण आहे. त्याच मुळे जिल्ह्यातील अनेक शाळा इमारतींना ५० वर्षे पूर्ण झालेली नसली तरी त्या खिळखिळ््या झाल्या आहेत. सतत दुरुस्त्या करूनही त्यांचे आयुष्य वाढविणे अवघड असल्याने अशा शाळा पाडण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. या शाळांचे दुरुस्तीचे व तंदुरुस्तीचे वय शासनाने ठरवू नये. निर्धारित वयोमानापूर्वीच किती शाळा खचल्या व त्या पाडण्याची गरज आहे, अशांची माहिती येत्या आठ दिवसांत जमा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अधिकारी देईनात माहितीसभापती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर विनोद तांबे यांनी पहिल्याच बैठकीत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळांची माहिती एका विशिष्ट रकान्यात भरून देण्यास सांगितले होते. त्यात शाळा दुरुस्तीची गरज, नवीन वर्गखोल्यांची गरज, किती शाळांना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, किती शाळांना मुला-मुलींची स्वतंत्र शौचालये आहेत, कपाऊंड वॉल आदी सर्व माहितीचा त्यात समावेश होता. या माहितीनुसारच पुढील दुरुस्ती वेगवेगळी कामे व नवीन वर्गखोल्या देण्याचे धोरण प्राधान्याने ठरविले जाणार होते. मागील तीन बैठकांपासून प्रत्येक बैठकीत या माहितीची मागणी करण्यात आली; परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापही माहिती तयार केली नाही, असेही या बैठकीत समोर आले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वारंवार शाळांना भेटी देणे सभापतींनी अनिवार्य केले होते. या भेटीचा विस्तृत अहवालही दर महिन्याच्या शिक्षण समितीच्या बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले होते; परंतु गटविकास अधिकारी मासिक बैठकीत केवळ शाळा भेटीचा आकडा सांगून मोकळे होतात.४ त्यामुळे शाळांची अवस्था नेमकी काय आहे, एखाद्या शाळेने राबविलेला नावीन्यपूर्ण उपक्रम, कोणत्या शाळेत काय प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर उपाय काय करता येतील, या अनुषंगाने काहीही निर्णय घेण्यास या भेटीचा फायदा होत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी येताना शाळा भेटीचे विस्तृत अहवाल तयार करून आणावेत, असे आज पुन्हा एकदा सांगण्यात आले, असे सभापतींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.