शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पाण्यात तणनाशक टाकले, शेडनेटमधील मिरचीचे पीक जळाले; शेतकऱ्याचे २५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:05 IST

संबंधित शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सिल्लोड : दोन एकर शेतात दोन शेड नेटमध्ये आसडी येथील दोन शेतकऱ्यांनी लावलेल्या सिमला मिरचीला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकल्याने मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

आसडी येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३२ मध्ये एका एकरात १२ हजार सिमला मिरचीची रोपे व साहेबराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३१ मधील एक एकर शेतात १२ हजार रोपे असे एकूण २ एकर क्षेत्रात २४ हजार झाडे मिरचीची झाडे लावली होती. गेल्या महिन्यात त्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणून टाकीत सोडले. त्याद्वारे ते ठिबक संचाच्या माध्यमातून या पिकाला पाच हजार लिटर टाकीतून पाणी देत होते. यासाठी त्यांनी ७ लाख रुपयांचा खर्च केला. या मिरचीतून त्यांना किमान २५ लाखांचे उत्पन्न निघाले असते; मात्र अज्ञात व्यक्तीने आठ दिवसांपूर्वी या दोन्ही शेतकऱ्यांच्या ठिबकच्या पाण्याच्या टाकीत गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकले. यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांत दिली तक्रारयाबाबत रविवारी या शेतकऱ्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. खोडसाळपणे केलेल्या कृत्याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तणनाशक औषधी मिश्रित पाणीमिरचीचे पिके पिवळे पडून पानगळ होत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजमध्ये टाकीतील पाण्याची तपासणी करून घेतली असता त्यामध्ये तणनाशक औषधी मिश्रित पाणी असल्याचे स्पष्ट झाले. हेच पाणी मिळाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा अहवाल कॉलेजने दिला आहे.-साहेबराव मिरगे, नुकसानग्रस्त शेतकरी आसडी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजनाCrime Newsगुन्हेगारी