शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पाण्यात तणनाशक टाकले, शेडनेटमधील मिरचीचे पीक जळाले; शेतकऱ्याचे २५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:05 IST

संबंधित शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सिल्लोड : दोन एकर शेतात दोन शेड नेटमध्ये आसडी येथील दोन शेतकऱ्यांनी लावलेल्या सिमला मिरचीला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकल्याने मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

आसडी येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३२ मध्ये एका एकरात १२ हजार सिमला मिरचीची रोपे व साहेबराव मिरगे यांनी त्यांच्या गट क्र. १३१ मधील एक एकर शेतात १२ हजार रोपे असे एकूण २ एकर क्षेत्रात २४ हजार झाडे मिरचीची झाडे लावली होती. गेल्या महिन्यात त्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणून टाकीत सोडले. त्याद्वारे ते ठिबक संचाच्या माध्यमातून या पिकाला पाच हजार लिटर टाकीतून पाणी देत होते. यासाठी त्यांनी ७ लाख रुपयांचा खर्च केला. या मिरचीतून त्यांना किमान २५ लाखांचे उत्पन्न निघाले असते; मात्र अज्ञात व्यक्तीने आठ दिवसांपूर्वी या दोन्ही शेतकऱ्यांच्या ठिबकच्या पाण्याच्या टाकीत गहू पिकात मारण्यात येणारे तणनाशक औषध टाकले. यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे मिरचीचे पीक पिवळे पडून पानगळ होत आहे. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी या दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांत दिली तक्रारयाबाबत रविवारी या शेतकऱ्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. खोडसाळपणे केलेल्या कृत्याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तणनाशक औषधी मिश्रित पाणीमिरचीचे पिके पिवळे पडून पानगळ होत असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॉलेजमध्ये टाकीतील पाण्याची तपासणी करून घेतली असता त्यामध्ये तणनाशक औषधी मिश्रित पाणी असल्याचे स्पष्ट झाले. हेच पाणी मिळाल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा अहवाल कॉलेजने दिला आहे.-साहेबराव मिरगे, नुकसानग्रस्त शेतकरी आसडी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजनाCrime Newsगुन्हेगारी