शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

श्रमात दडली दौलत ! पुराने वाट अडवली; शेतकऱ्यांनी श्रमदानातून अल्पावधीतच उभारला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:06 IST

तलाव ओसंडून वाहू लागल्याने आलेल्या पुरात जुना पूल वाहून गेला.

ठळक मुद्देपूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमीचा फेरा पडत होता. 

कन्नड : 

नको कुणाची भीक दयेची, चाड धरु कष्टाची, श्रमात दडली दौलत आपल्या भावी सुखस्वप्नांची ॥ मंत्र यशाचा चैतन्याचा, हाच धरु या चित्ती, भविष्य आपुले आपल्या हाती, घडवू नविन क्रांती ॥ 

या ओळी समान कार्य सत्यात उतरवले आहे चिखलठाणच्या उपक्रमशील शेतकऱ्यांनी. ऐकीचे बळ दाखवत येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून एका पुलाची उभारणी केली आहे. याचा फायदा अनेक ग्रामस्थांना होत असून त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

चिखलठाणपासून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर वडाळी नावाहून येणारी नदी लागते. याच नदीवर वाघदरा लघुसिंचन तलाव आहे. या नदीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने चार मोठे पाईप टाकून पूल तयार केला होता. परंतु तलाव ओसंडून वाहू लागल्याने आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमीचा फेरा पडत होता. 

सध्या संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीचा प्रवाह कमी झाला नाही. यामुळे पुलावरील रस्ता बंद अवस्थेतच राहिला. याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना कुणी मदतीचा हात दिला. अखेर सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून काही रिकाम्या गोण्या विकत आणल्या. त्यानंतर सर्वांनी श्रमदानातून पूल तयार करण्याचा संकल्प केला. रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरुन त्या पाईपवर रचल्या. त्यावर  मातीमिश्रीत वाळू टाकण्यात आली आणि बघताबघता दोनशे गोण्यातून मजबूत पूल साकार झाला. 

या उपक्रमात पोपट चव्हाण, एकनाथ तुरे, दत्तु पाटील चव्हाण, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ जाधव, भगवान चव्हाण, सुनिल चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, विलास दळे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा पंचक्रोशीत होत असून एकीचे बळ दाखवत शेतकऱ्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरAurangabadऔरंगाबाद