शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

श्रमात दडली दौलत ! पुराने वाट अडवली; शेतकऱ्यांनी श्रमदानातून अल्पावधीतच उभारला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:06 IST

तलाव ओसंडून वाहू लागल्याने आलेल्या पुरात जुना पूल वाहून गेला.

ठळक मुद्देपूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमीचा फेरा पडत होता. 

कन्नड : 

नको कुणाची भीक दयेची, चाड धरु कष्टाची, श्रमात दडली दौलत आपल्या भावी सुखस्वप्नांची ॥ मंत्र यशाचा चैतन्याचा, हाच धरु या चित्ती, भविष्य आपुले आपल्या हाती, घडवू नविन क्रांती ॥ 

या ओळी समान कार्य सत्यात उतरवले आहे चिखलठाणच्या उपक्रमशील शेतकऱ्यांनी. ऐकीचे बळ दाखवत येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून एका पुलाची उभारणी केली आहे. याचा फायदा अनेक ग्रामस्थांना होत असून त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

चिखलठाणपासून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर वडाळी नावाहून येणारी नदी लागते. याच नदीवर वाघदरा लघुसिंचन तलाव आहे. या नदीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने चार मोठे पाईप टाकून पूल तयार केला होता. परंतु तलाव ओसंडून वाहू लागल्याने आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमीचा फेरा पडत होता. 

सध्या संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीचा प्रवाह कमी झाला नाही. यामुळे पुलावरील रस्ता बंद अवस्थेतच राहिला. याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना कुणी मदतीचा हात दिला. अखेर सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून काही रिकाम्या गोण्या विकत आणल्या. त्यानंतर सर्वांनी श्रमदानातून पूल तयार करण्याचा संकल्प केला. रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरुन त्या पाईपवर रचल्या. त्यावर  मातीमिश्रीत वाळू टाकण्यात आली आणि बघताबघता दोनशे गोण्यातून मजबूत पूल साकार झाला. 

या उपक्रमात पोपट चव्हाण, एकनाथ तुरे, दत्तु पाटील चव्हाण, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ जाधव, भगवान चव्हाण, सुनिल चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, विलास दळे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा पंचक्रोशीत होत असून एकीचे बळ दाखवत शेतकऱ्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरAurangabadऔरंगाबाद