शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांवर यापुढेही कारवाई करू

By admin | Updated: August 22, 2014 00:58 IST

तुळजापूर : कोणत्याही व्यापाऱ्यास अथवा वाहनधारकास त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. परंतु जे व्यापारी, वाहनधारक कायद्याचे उल्लंघन करून दुकानासमोर अतिक्रमण



तुळजापूर : कोणत्याही व्यापाऱ्यास अथवा वाहनधारकास त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. परंतु जे व्यापारी, वाहनधारक कायद्याचे उल्लंघन करून दुकानासमोर अतिक्रमण अथवा अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर यापुढेही नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिला.
बुधवारी येथील सर्किट हाऊसवर जिल्हाधिकारी, न.प. प्रशासन व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. नवरात्रोत्सवात भाविकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांना साहित्य भरणे अवघड जाते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी कमी गर्दीच्या वेळी चार-पाच वाहनांद्वारे व्यापाऱ्यांच्या दुकानापर्यंत माल आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, यासाठी बारगेटींग करण्यात येईल. दुकानासमोर साहित्य मांडण्यासाठी एक मीटर जागेची परवानगी द्यावी, अशी विनंती व्यापाऱ्यांनी यावेळी डॉ. नारनवरे यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी नारनवरे म्हणाले की, दुकानदारांनी अगोदरच दुकानाचे बांधकाम वाढविले आहे. त्यामुळे अशी अधिकची जागा कोणालाही देता येणार नाही. याउपर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. बैठकीस तहसीलदार काशीनाथ पाटील, पोनि ज्ञानोबा मुंडे, मुख्याधिकारी राजीव बुबणे, व्यवस्थापकीय तहसीलदार सुजीत नरहरे, मंदिर कर्मचारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाधान कदम, नगरसेवक दयानंद हिबारे, सचिन अग्रवाल, विश्वजित पाटील, बालाजी भालेकर, शिवाजी बोधले, राहुल साठे, इंद्रजित साळुंके, बबलू रोकडे, मनु अग्रवाल इ. व्यापारी या बैठकीस उपस्थित होते. (वार्ताहर)

गणेश वर्गणी मागताना ज्या मंडळाकडून सक्ती केली जाईल, त्या मंडळावर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे यांना दिले. मंडळानीही वर्गणीसाठी कोणाला सक्ती, धाकदपटशा करु नये असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडावा, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. नवरात्र काळात पायी येणाऱ्या भाविकांना त्रास होवू नये म्हणून व्हीआयपीची वाहने दिपक चौकापर्यंत आणण्याच्या सूचनेचा विचार करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.