शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

कोरडे पडलेले पाणवठे वन्यजीवांसाठी जलमय

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

गजानन वाखरकर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले

गजानन वाखरकर, औंढा नागनाथज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्यामुळे या विभागाच्या वतीने विकत घेवून पाणी पाणवठ्यात सोडण्यात येत आहे. हे काम सध्या सुरू असल्याने या उपक्रमाचे वन्यप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वनपर्यटन परिसरामध्ये १२ पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले होते. त्यालगत असलेल्या तलावातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याने या पाणवठ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या बगीचासाठी सुद्धा विकत घेवून पाणी देण्याचे काम वनपरिमंडळ अधिकारी एस. आर. दोडके, वनरक्षक ए. व्ही. भोसले, विलास चव्हाण, गोपाळ टोम्पे हे करीत आहेत. या ठिकाणी गार्डनमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सुद्धा पाणी देवून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे २, अंजनवाडा येथे ३ व दुधाळा येथे २ असे पाणवठे जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आले होते. नैसर्र्गिक जलस्त्रोत व तलाव, खाजगी विहिरींमधून पाणी घेवून या पाणवठ्यामध्ये सोडल्या जात होते. गत दोन महिन्यांपासून हे सर्व जलस्त्रोत आटल्याने जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी गावालगत असलेल्या शेतामध्ये भटकत होते. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत बांधण्यात आलेल्या पाणवठ्यामध्ये टँकरने विकत पाणी घेवून सोडण्यास सुरूवात केली आहे. आठ दिवसांतून एकवेळा हे पाणी पाणवठ्यात सोडल्या जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे यांनी दिली आहे. पूर्व विभागात भटकंती : प्राण्यांचे हालऔंढा नागनाथ तालुक्यातील पुर्व परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये मोजक्याच ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी झालेले काम थातूरमातूर केल्याने हे पाणवठे जमीनदोस्त झाले आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.यंदाच्या दुष्काळाची दाहकता जंगलातील प्राण्यांनाही जाणवत आहे. जलालदाभा, सिरळी, सेंदूरसेना, सुकळी, मरसूळवाडी व शिरडशहापूर परिसरातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करत नागरीवस्तींकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यता वाढली आहे. औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वन पर्यटन परिसरामध्ये तयार करण्यात आलेले १२ पाणवठे यंदा कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी शोधताना भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे.