शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 9:56 PM

वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसत असून, गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात पूर्वी घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे ते जमिनीत पाझरुन परिसरातील जलसाठे प्रदूषित झाले आहेत. वाळूज महानगर परिसरातील विहिरी, हातपंप, बोअरवेल आदींचे पाणीही दूषित झाले आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे याचा पुरवठा ग्रामपंचायतींना थांबविला आहे. रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वडगाव, पंढरपूर, वाळूज, वळदगाव आदी ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसीकडे पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर दशकभरापासून यातील काही ग्रामपंचायतीना एमआयडीसीने पाणी पुरवठा सुरु केला आहे.

सध्या जायकवाडी जलाशयात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने महिनाभरापूर्वी उद्योग व निवासी क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका वाळूज, पंढरपूर, वडगाव, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतींना बसला आहे. पूर्वी या ग्रामपंचायतीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता फक्त १२ तास पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने अघोषित ५० टक्के पाणी कपात केल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद