शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेला लागले गळतीचे ग्रहण !

By admin | Updated: July 24, 2014 00:13 IST

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे.

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे. मात्र या योजना कार्यान्वित होवून काही महिन्यांचा कालावधी लोटलेला असतानाच ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा मागील दहा दिवसांपासून बंद पडला असून, नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, २३ कोटी रुपये खर्च करुन माकणी धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. भीषण टंचाईच्या काळात ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला प्रतिदिन ३० लाख लिटर पाणी धरणातून उचलले जात होते. हे पाणी शहरातील ५ हजारावर नळकनेक्शन धारकांना पुरवठा करण्यात येत होते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेला जागोजागी गळती लागली आहे. एका ठिकाणची गळती दुरुस्त करेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी सुरु होत आहे. माकणी ते समुद्राळ या २७ कि.मी. अंतरासाठी २००४-०५ साली १२ इंची लोखंडी पाईपलाईन करण्यात आली आहे. सास्तूर, माकणी, समुद्राळ आणि कोंडजीगड या रस्त्याचे व दूरसंचारचे वायर टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना या पाईपलाईनला सतत गळती लागत आहे. गेल्या सात दिवसांपासून कोंडजीगड, समुद्राळ, नागराळ या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. समुद्राळ व नागराळ येथील काम पूर्ण झाले असून, कोंडजीगड येथील गळती काढण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरु होते. दरम्यान, यासंदर्भात नगराध्यक्षा केवळबाई औरादे यांच्याशी संपर्क साधला असता, दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली असून, गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे त्या म्हणाल्या.तीव्र पाणीटंचाईजलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मागील आठ दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उमरगेकरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुरुस्तीसाठी साहित्य नाहीजलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे पाईपलाईनची गळती काढण्यास विलंब होत आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे शिरगुरे यांनी सांगितले. आणखी पाच दिवस लागणारपाईपलाईनची गळती काढण्याचे काम मागील सात दिवसांपासून सुरु आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये हे काम पूर्ण करुन टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता स्वामी यांनी सांगितले.जलकुंभात ठणठणाटसमुद्राळ येथे १९९२-९३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ६८ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले आहे. मात्र जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सदरील जलकुंभामध्ये ठणठणाट आहे.