शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:25 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून, दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ४५९ गावांना ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे.

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून, महिनाभरातच १२३ गावे टंचाईच्या विळख्यात आली आहेत. मागच्या महिन्यात २९८ गावे आणि ४८ वाड्यांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा सारखा वरती सरकत असल्याने गाव परिसरातील विहिरी, हातपंप, तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३९८ गावे, ६१ वाड्या, असे मिळून ४५९ गावे तहानलेली आहेत. त्यावर जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून, ६४६ टँकरच्या १२३७ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी फक्त सोयगाव तालुक्यात पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या एकाच तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित आठही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी खुलताबाद तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ८६ गावे, पैठण तालुका- ७९, छत्रपती संभाजीनगर तालुका- ८२, वैजापूर तालुका- ८८, फुलंब्री-५१, सिल्लोड- ४५, खुलताबाद- ५ आणि कन्नड तालुक्यातील २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

३४० विहिरींचे अधिग्रहणजि. प. पाणीपुरवठा विभागाने तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २७४ गावांतील ३४० विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई