शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:25 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून, दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ४५९ गावांना ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे.

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून, महिनाभरातच १२३ गावे टंचाईच्या विळख्यात आली आहेत. मागच्या महिन्यात २९८ गावे आणि ४८ वाड्यांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा सारखा वरती सरकत असल्याने गाव परिसरातील विहिरी, हातपंप, तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३९८ गावे, ६१ वाड्या, असे मिळून ४५९ गावे तहानलेली आहेत. त्यावर जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून, ६४६ टँकरच्या १२३७ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी फक्त सोयगाव तालुक्यात पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या एकाच तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित आठही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी खुलताबाद तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ८६ गावे, पैठण तालुका- ७९, छत्रपती संभाजीनगर तालुका- ८२, वैजापूर तालुका- ८८, फुलंब्री-५१, सिल्लोड- ४५, खुलताबाद- ५ आणि कन्नड तालुक्यातील २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

३४० विहिरींचे अधिग्रहणजि. प. पाणीपुरवठा विभागाने तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २७४ गावांतील ३४० विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई