शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

By विजय सरवदे | Updated: May 9, 2024 16:25 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून, दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ४५९ गावांना ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे.

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून, महिनाभरातच १२३ गावे टंचाईच्या विळख्यात आली आहेत. मागच्या महिन्यात २९८ गावे आणि ४८ वाड्यांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा सारखा वरती सरकत असल्याने गाव परिसरातील विहिरी, हातपंप, तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३९८ गावे, ६१ वाड्या, असे मिळून ४५९ गावे तहानलेली आहेत. त्यावर जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून, ६४६ टँकरच्या १२३७ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी फक्त सोयगाव तालुक्यात पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या एकाच तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित आठही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी खुलताबाद तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ८६ गावे, पैठण तालुका- ७९, छत्रपती संभाजीनगर तालुका- ८२, वैजापूर तालुका- ८८, फुलंब्री-५१, सिल्लोड- ४५, खुलताबाद- ५ आणि कन्नड तालुक्यातील २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

३४० विहिरींचे अधिग्रहणजि. प. पाणीपुरवठा विभागाने तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २७४ गावांतील ३४० विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई