शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा; खंडपीठाची तीव्र नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:00 IST

शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, खंडपीठाने दिले निर्देश

छत्रपती संभाजीनगर : सध्या तीव्र उन्हाळ्याच्या काळात शहरवासीयांना १० ते १२ दिवसांनंतर होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, असे निर्देश खंडपीठाने बुधवारी महानगरपालिकेला दिले.

काही भागांत ७ दिवसांनंतर तर काही भागांत ८ दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्यात येतो, असे निवेदन ‘मनपा’तर्फे ॲड. संभाजी टोपे यांनी केले. त्यांचा दावा फोल ठरवत न्यायालयाचे मित्र ॲड. सचिन देशमुख आणि मूळ याचिकाकर्ता ॲड. अमित मुखेडकर यांनी १० ते १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

रोडमॅप सादरउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘जीव्हीपीआर’ कंपनीने शहर पाणीपुरवठा योजनेचा ‘रोडमॅप’ सादर केला. पाणीपुरवठा योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी खंडपीठातर्फे नेमलेल्या समितीने ‘रोडमॅप’वर चर्चा करून आपले अभिप्राय पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

तक्रारीच्या अनुषंगाने कारवाईखंडपीठाच्या आदेशानुसार पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड खंडपीठात हजर होते. एमजेपी आणि कंत्राटदार यांंच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून तक्रारदारांना पोलिस संरक्षण दिल्याची माहिती त्यांनी खंडपीठास दिली.

कोणीही हस्तक्षेप करू नयेसदर प्रकल्प जनहिताचा असल्यामुळे त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे खंडपीठाने बजावले. कोणी हस्तक्षेप केल्यास ‘एमजेपी’ने तक्रार द्यावी. त्यावर उच्च न्यायालयातर्फे नेमलेल्या समितीने कारवाई करावी, असे निर्देश दिले.

कामात अनेक त्रुटीया योजनेच्या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून देत मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी ‘जॅकवेल’च्या कामाबाबत तीव्र आक्षेप नोंदविला. कंत्राटदाराला अधिक मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. त्यावर अधिक मनुष्यबळ वाढवून पावसाळ्यापूर्वी ‘जॅकवेल’चे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन कंत्राटदाराने दिले. जलवाहिन्या अंथरण्यासाठी शहरभर रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आहेत. ते तसेच आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते भरले नाही तर नागरिकांना मोठा त्रास होईल. शासकीय नियमानुसार योजनेच्या कामाचे ‘त्रयस्थ’ पार्टीकडून परीक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती त्यांनी केली. या जनहित याचिकेवर ११ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ