शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:28 IST

आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : जिल्ह्यात ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत, तर अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांची पाण्यासाठी मैलोन्मैली भटकंती सुरू आहे. मध्यंतरी टंचाई आराखड्याची मुदत संपल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दरम्यान, दोन दिवसांच्या खंडानंतर शासनाने टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली. आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.वास्तविक उन्हाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनामार्फत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार केला जातो. ज्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे, त्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो; परंतु यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात २९६ गावे व १३ वाड्या आजही तहानलेल्याच आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला तरीही भूगर्भातील पाणीपातळी वाढलेली नाही.विहिरी, नदी-नाले, हातपंप, तलाव, कोल्हापुरी बंधारे हे पाण्याचे मुख्य स्रोत मानले जातात. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या योजनाही ग्रामीण भागाला वरदान ठरू शकल्या नाहीत.जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई ही गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद आणि पैठण तालुक्यांना भेडसावत आहे. सध्या जिल्ह्यातील १७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे, असे असले तरी कन्नड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये मात्र, फारशी पाणीटंचाई जाणवत नसून त्या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही टँकर सुरू नाही.टँकरची तालुकानिहाय स्थितीऔरंगाबाद - ४४गंगापूर- ७८कन्नड- ००खुलताबाद- २७पैठण- ३९फुलंब्री - ३२सिल्लोड - ३४सोयगाव - ००वैजापूर - ६६

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद