शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

औंढा तालुक्यातील २२ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: July 7, 2014 00:32 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील २२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीकडे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

औंढा नागनाथ : तालुक्यातील २२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पंचायत समितीकडे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यापैकी १० गावांमध्ये प्रशासनाने विहीर व बोअरचे अधिग्रहन केले आहे; परंतु ११ गावे अजूनही तहानलेली असून अधिग्रहणासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांची पाहणी करण्यात येत आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळखोपा, रुपूर तांडा, देवाळा या ठिकाणी दोन महिन्यापूर्वीच विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यानंतर दुधाळा, दुधाळा तांडा, हिवरा जाटू, काठोडा तांडा, काकडदाभा, फुलदाभा, तुर्कपिंप्री या गावांमध्ये पाण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले; परंतु त्याचप्रमाणे जलालपूर, वगरवाडी, शिरडशहापूर, पिंपळदरी, वगरवाडीतांडा, देवाळा तर्फे लाख, चोंढी शहापूर, गढाळा, मेथा, बैनाराव सावळी, सावळी तांडा, सिद्धेश्वर तांडा या ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासंदर्भात पंचायत समितीत हे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्या नुसार औंढा येथील तहसीलदार श्याम मदनुरकर हे गावांची पाहणी करताना दिसून येत आहेत. जून संपला तरी पाऊस न पडल्याने ही स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती अशीच राहिल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. (वार्ताहर)