शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल, असा होतो पाण्याचा काळाबाजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:16 IST

वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्यावर अक्षरश: दरोडा टाकण्यात येत आहे. महापालिकेने नियुक्त केलेला कंत्राटदार, पाण्याच्या टाक्यांवर नियुक्त केलेले कर्मचारी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा चालक यांच्या संगनमताने पाण्याचा काळाबाजार कशा पद्धतीने चालतो, याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

शहरात सध्या सर्वत्र पाण्यासाठी प्रचंड ओरड होत आहे. नागरिकांच्या हक्काचे टँकरचालक नेत आहेत. पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा, बीड बायपास येथील हॉटेल व्यावसायिकांना पाणी विकण्यात येत आहे. कोटला कॉलनी पाण्याच्या टाकीवरून तब्बल १२ हजार लीटरचे टँकर पहाटे ४ वाजेपासून भरून विकण्यात येतात, अशीही धक्कादायक माहिती आहे.

टाकीवरील कर्मचारी मालामालमहापालिकेने ८० पेक्षा अधिक टँकर नेमले आहेत. कोटला कॉलनी, एन-५, एन-७, नक्षत्रवाडी येथून टँकर भरले जातात. एक टँकर किमान ७ फेऱ्या करतो. जास्तीतजास्त ९ फेऱ्याही होतात. काळ्याबाजारात टँकर नेण्यासाठी टाकीवरील कर्मचारी एका फेरीचे १०० रु. घेतो. दिवसभरात किमान १०० फेऱ्यांचे १० हजार रु. तो खिशात घालतो. महिना ३ लाख रुपयांची कमाई एक कर्मचारी करतो, हे विशेष.

कंत्राटदाराचे बिल दरमहा ५० लाखमहापालिका कंत्राटदाराला किलोमीटरनुसार पैसे देते. ८० टँकरचे बिल दरमहा किमान ५० ते ५५ लाख रु. होते. वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात. एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही, हे विशेष.

टँकरचालकांची वेगळी कमाईटँकरचालक ज्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करतात तेथे ५० रुपये ड्रमप्रमाणे पाणी राजरोसपणे विकतात. त्याचप्रमाणे अनेक नागरिक मनपात येऊन पैसे भरू शकत नाहीत. एका ग्रुपचे १८ ते २० हजार रुपये टँकरचालक मनपात भरतो, म्हणून स्वत:कडेच ठेवून घेतात. चोरून आणलेले पाणी नंतर त्यांना देत असतात.

‘लोकमत’चा दणकामनपाने नियुक्त केलेले टँकरमाफिया पाण्याचा कशा पद्धतीने काळाबाजार करीत आहेत, यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारपासून वृत्तमालिका सुरू केली. याची दखल घेत मनपा प्रशासनाने प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांची उचलबांगडी केली. पाणीपुरवठ्यात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे कंत्राटी पद्धतीवर मनपात आहेत. त्यांच्याकडे पूर्ण अधिकारासह पाणीपुरवठा विभाग सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी