शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून सुटणार पाणी

By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगांगा विभागाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी इसापूर धरणाचे पाणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला सोडण्याच्या सूचना ११ मार्च रोजी दिल्या आहेत.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगांगा विभागाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी इसापूर धरणाचे पाणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला सोडण्याच्या सूचना ११ मार्च रोजी दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सुटणार आहे. मार्च महिना अर्ध्यावर संपत आला असला तरी, अद्याप उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले नाही. त्यामुळे या कालव्याच्या बाजूला असलेल्या बाळापूर, वारंगा, वाकोडी, डोंगरकडा व भाटेगाव, वडगाव, जवळा पांचाळ, डिग्रस बु. व खु, दांडेगाव, रेडगाव, सुकळीवीर आदी गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. तानाजी मुटकूळे व निवृत्त कार्यकारी अभियंता पी. आर. देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेवून पाण्याची समस्या मांडली. दरम्यान जलसंपदामंत्री महाजन यांनी तत्काळ उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाला पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सुटणार आहे. (प्रतिनिधी)