शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जायकवाडीत ६ टक्के पाणी वाढले; पण धरण मृतसाठ्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:59 IST

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग वाढविला

ठळक मुद्दे४० हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक अपेक्षितनाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ) : गेल्या तीन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ६ टक्के वाढ झाली असून, धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आता फक्त ३.५ टीएमसी पाण्याची गरज आहे. गेल्या २४ तासांत धरणात १.८१ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारपासून वाढविण्यात आलेला विसर्ग आजही  कायम आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत  आहे. सायंकाळी ४ वाजता धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने पाणी दाखल होत होते. मध्यरात्रीनंतर आवक ४०,००० क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्याला काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिकातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज दारणा धरणातून ९२५४ क्युसेक, गंगापूर धरणातून ८८३३ क्युसेक, कडवा धरणातून ७७६ क्युसेक, पालखेड धरणातून २८१० क्युसेक असा विसर्ग सुरू होता.

नांदूर-मधमेश्वर वेअरमधून सोमवारपासून गोदावरी पात्रात सुरू असलेला विसर्ग आजही ५०,०६५ क्युसेकने सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीला दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मंगळवारी सायंकाळी ४०,००० क्युसेक विसर्ग होत होता. हे पाणी मंगळवारी रात्री आठनंतर जायकवाडी धरणात दाखल होईल, असे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. जायकवाडी धरणात २९१६९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९२.११ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ६६७.३९४ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १००.७१२ दलघमी ( ३.५ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा-४.६३ टक्के झाला आहे.

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव )

४० हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक अपेक्षित गेल्या दोन दिवसांपासून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५० हजार क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी मंगळवारी सायंकाळी ४० हजार क्युसेक क्षमतेने वाहती होती. गोदावरीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ नोंदविली जात असल्याने मंगळवारी रात्री ८ वाजेनंतर धरणातील आवक ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त होईल, अशी माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

 

 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीNashikनाशिकRainपाऊसgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरण