शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 3:28 PM

क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

ठळक मुद्देमागण्या मान्य करण्यासाठी शासनाला आठ दिवसाची मुदत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत माहिती

औरंगाबाद: मराठा समाजाच्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकाना अटक करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आता आठ दिवसांत समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मातोश्रीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

त्यांनी सांगितले की, क्रांतीचौकात ८ ऑगस्टपासून सनदशीरमार्गाने  ठिय्या देणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी आंदोलकाना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्या आश्वासनाची अमलबजावणी झाली नाही. मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान  देणाऱ्या ४२ बांधवांच्या वारसाला प्रत्येकी १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र केवळ बीड जिल्ह्यातील ७ तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात आली. उर्वरीत कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, गत सरकारच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेली १३ हजार गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. 

मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही

औरंगाबादमधील क्रांतीचौकात १० ऑगस्ट रोजी आंदोलकाना अटक करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न शासनाने केला. आठ दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास थेट मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. पोलीस आम्हाला जेथे अडवतील तेथे ठिय्या देऊ, आमरण उपोषण करू मात्र मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे विविध गट आंदोलन करीत आहेत तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलन का करत नाही असे विचारले असता केरे पाटील आणि कुढेकर म्हणाले की, आम्ही जरी वेगवेगळे आंदोलन करीत असलो तरी आमच्या मागण्या एकच आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार