शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाची अद्यापही प्रतीक्षा

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली आहे.

सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तयारी सुरू केली आहे. जमिनीच्या मशागती शेवटच्या टप्प्यात असून पेरणीच्या वेळी सावकाराच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्‍यांना बँकेकडून तातडीने पीककर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी शेतीतील संकटांना सामोरे जात खरीप हंगामाच्या पीक उत्पादनाचे नियोजन सुरू केले आहे. शेतीतील नियोजन करताना लागणारे पैशांचे नियोजनही करण्यासाठी शेतकर्‍यांनी खाजगी सावकारांच्या दारात चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. राष्टÑीयीकृत बँकेकडून दिल्या जाणारे अल्प व्याजदरातील कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी बँकेकडेही चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. ऐन पेरणीच्या गडबडीत पीक कर्ज वाटप सुरू होते. त्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीकडे पाठ फिरवित बँकेसमोर ठाण मांडावे लागते. शेतीतील पेरणीची वेळ विलंबाने झाल्याने पीक उत्पादनात घट येते. त्यामुळे मे महिन्याच्या १५ तारखेपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे नियोजन बँकेने करणे अपेक्षित होते. परंतु बघू, करु या मोघम उत्तराने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी अनेक चकरानंतर प्रतिसाद मिळतो. गतवर्षी बँकेने नवीन शेतकर्‍यांना पीककर्ज दिले नाही. त्यांच्याकडे कर्ज होते त्या कर्जाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना कर्जाचा लाभ मिळाला नाही. पर्यायाने अव्वाच्या सव्वाच्या व्याजदर असलेल्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. गत वर्ष हे शेतकर्‍यांसाठी संकटाचे वर्ष म्हटले तर वावगे ठरणार नाही़ खरीप हंगामात अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे खरीप पीक शेतकर्‍यांच्या हाती लागले नाही़ एवढे कमी की काय रबी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा यासह फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला़ त्यानंतर शासनाने नुकसान भरपाईचे पंचनामे करून जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली़ परंतु, अद्यापही काही शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर) अवघ्या दहा ते बारा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे़ शेतकर्‍यांनी शेतीची कामे पूर्ण केली आहेत़ आता खरिपाच्या पेरणीसाठी खत, बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत़ परंतु बॅकेकडून वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे़सोनपेठ तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला़ त्यामुळे आता खरीप पेरणी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडे पीककर्ज काढण्यासाठी शेतकरी चकरा मारीत आहेत़ परंतु बँकेकडे चकरा मारूनही कर्ज मिळत नसल्याने आता खरीप पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत़