शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पंधराशे शेतकऱ्यांना कृषीपंपांची प्रतीक्षा

By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST

विठ्ठल भिसे, पाथरी कृषीपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी कोटेशन भरूनही विद्युत साहित्य आणि वीज कनेक्शन न मिळाल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़

विठ्ठल भिसे, पाथरी
कृषीपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी कोटेशन भरूनही विद्युत साहित्य आणि वीज कनेक्शन न मिळाल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ २०११ पासून जवळपास पंधराशे शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत़ तर दोन महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी साहित्याचा पुरवठा करणारा ठेकेदार नसल्याने या काळामध्ये नवीन वीज कनेक्शन देण्यात आले नाही़
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शनचा पुरवठा करणे आणि साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ चार वर्षांत ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी साहित्याचा पुरवठा न केल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मे २०१४ अखेर तालुक्यामध्ये पंधराशे शेतकरी वीज कोटेशन भरूनही विद्युत जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत़ जानेवारी २०११ मध्ये तालुक्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशन भरले़ त्यानंतरही कृषीपंपाचे कोटेशन भरणेच चालू होते़
आतापर्यंत २०१० कोटेशन भरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीपंपांचा साहित्य पुरवठा करण्यात आला़ त्यानंतर मात्र कोटेशन भरणारे शेतकरी अद्यापही कृषी पंपाच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत़ पाथरी तालुक्यातील कृषी पंपासाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची मुदत दोन महिन्यांपूर्वी संपली़ नवीन ठेकेदार अद्याप नियुक्त करण्यात आला नाही़ यामुळे मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांना कृषीपंपाचे कनेक्शन जोडण्यात आले नाहीत़ सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नसल्याने सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करता येत नाहीत़ अनेक शेतकरी या बाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चकरा मारून विचारणा करीत आहेत़ परंतु, शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पडत आहे़ ठेकेदार पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वेळेच्या आत वीज कनेक्शन मिळेल, अशी अपेक्षा असतानाही ठेकेदार पद्धती शेतकऱ्यांना गैरसोयीची ठरू लागली आहे़
शासनाकडून दुर्लक्ष
एकीकडे शासन प्रत्येक शेतकऱ्याला वेळेच्या आत वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेत असतानाही तालुक्यातील मागील साडेतीन वर्षांपासून शेतकरी कृषीपंपांच्या कनेक्शनसाठी झगडत आहेत़ यासाठी शासन जवाबदार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़
कृषीपंपांना वीजजोडणी तातडीने करावी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रेणापूर येथील ज्येष्ठ शेतकरी गंगाधरराव गायकवाड यांनी केली आहे़
ठेकेदारांकडून साहित्य पुरवठा नाही
प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी साहित्याचा पुरवठा करताना ठेकेदार चालढकल करतात़ वास्तविक पाहता वीज मंडळाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वीज पोल उभे करून विजेचे कनेक्शन ओढून देण्यापर्यंत ठेकेदारांची जिम्मेदार असताना देखील ठेकेदार शेतकऱ्यांना गोदामातून साहित्य नेण्यास सांगतात आणि त्यांच्याकडूनच वीज पोल उभारणीच्या कामापासून तार ओढण्याचे कामही करून घेतात़ त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे़