शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नवीन वर्षात वडगावचा पाणीप्रश्न सुटणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:31 IST

डगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आजही वडगावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता नवीन वर्षात तरी गावाचा पाणीप्रश्न सुटणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वडगावमध्ये अनेक वर्षापासून गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने जवळपास ४ कोटी रुपये खर्च करुन पेयजल योजना राबविली. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली. ही योजना फसल्यानंतर ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाणी विकत घेण्याचा निर्णय घेवून एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभ पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोग निधीतून १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मुख्य जलवाहिनीचे कामही करण्यात आले.

पण छत्रपतीनगर, फुलेनगर, सलामपुरेनगर भागात अंतर्गत पाईपलाईन अभावी पाणी पोहचत नसल्याने ग्रामपंचयतीने मूळ गावासह या भागात अंतर्गत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला. १ कोटी ४० लाख रुपयांमधून जवळपास २० किलोमीटर पाईपलाईनचे काम मार्च २०१८ मध्ये ग्रामपंचायतीने पटेल कन्स्ट्रक्शन या एजन्सीला दिले. पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. मध्यंतरी कंपनीने पाईप आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यास ग्रामपंचायतीने नकार दिला. विशेष म्हणजे कामात भागीदारी द्यायला कंपनी तयार नसल्याने एका पदाधिकाºयाने या कामात खोडा घातला होता. पण कंपनी पुन्हा तयार झाल्यानंतर पाईप आणायचे कोणी यावरुन एकमत होत नसल्याने हे काम तसेच रखडले गेले. काही दिवसांपूर्वी कमासाठी आणलेल्या जुन्या पाईपवरुन वादळ उठले होते. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी व बिडकीन पोलिसांनी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाºयांची चौकशीही केली होती. तरीही पाईपलाईनचे कामाला सुरुवात झाली नाही. ग्रामपंचायत व कंपनीच्या वादात पाईपलाईनचे काम रखडल्याने लगतच्या परिसरात पायपीट करुन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. या प्रकरणी सरपंच उषा एकनाथ साळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामासंदर्भात वारंवार संपर्क करुनही ठेकेदार प्रतिसाद देत नाही. ८ दिवसांत काम सुरु केले नाही तर सदरील कामाचे टेंडर रद्द करुन पुन्हा नव्याने टेंडर काढले जाईल, असे त्यांनी सांगितले.

नविन वर्षात तरी पाणीप्रश्न सुटणार ?पाण्यासाठी छत्रपती नगरातील महिलांनी दोनवेळा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे. यावेळी ग्रामपंचायतीने सुुरुवातील ३ दिवसांत काम सुरु करु तर दुसºयांदा १ नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात केली जाईल असे महिलांना आश्वासन दिले होते. याला दोन महिने झाले तरी अजून काम सुरु होण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे येणाºया नवीन वर्षात तरी पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूज