विलासरावांची जयंती विकासदिन म्हणून होतेय साजरी

By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-26T00:19:31+5:302014-05-26T00:26:00+5:30

लातूर : दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिन हा विकासदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे़

Vilasrao Jayanti celebrates the birth anniversary of the day | विलासरावांची जयंती विकासदिन म्हणून होतेय साजरी

विलासरावांची जयंती विकासदिन म्हणून होतेय साजरी

 लातूर : दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिन हा विकासदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे़ यानिमित्ताने विकास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील गावांत महत्त्वाकांक्षी जलसंधारणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे़ या जलसंधारण कामाअंतर्गत नदी- नाला खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत़ त्याचा प्रारंभ सोमवारी जयंतीदिनी होणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, रेनवॉटर हार्वेस्टिंग तसेच जलसंधारण कामाचा प्रारंभ सोमवार, २६ मे रोजी दुपारी ४़३० वा़ लातूर तालुक्यातील शिराळा येथे होेणार आहे़ या कार्यक्रमास आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ जलसंधारणाची ही कामे एकुर्गा, ढाकणी, निवळी, बोरगाव काळे, हिसोरी, खंडाळा, चिंचोली ब़, गोंदेगाव येथे करण्यात येणार आहे़ सतत पडणारे अल्प पर्जन्य व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी व साखर उद्योग अडचणीत आला आहे़ भविष्याची गरज ओळखून विकास सहकारी साखर कारखान्यामार्फत जलसंधारण कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे़ भविष्यात कार्यक्षेत्रातील सर्व गावात ही कामे टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहेत़ कारखाना प्रक्रियेत, कारखाना कार्यस्थळी व कारखाना कार्यक्षेत्रात जलव्यवस्थापन करण्यासाठीचे पथदर्शी प्रयोग राबविणारा विकास सहकारी साखर कारखाना पहिला कारखाना ठरला आहे़ कारखाना कार्यस्थळी मागील वर्षी पाणी अडवा- पाणी जिरवा प्रकल्प राबविण्यात आला आहे़ यामध्ये समतल चर खोदून माथा ते पायथा जलसंधारण करण्यात आले आहे़ नदी- नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरणाचे काम कारखान्यामार्फत सावरगाव येथे करण्यात आले आहे़ भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता जलव्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांतूनच हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार एकुरगा, ढाकणी, निवळी, बोरगाव काळे, हिसोरी, खंडाळा, चिंचोली (ब.) व गोंदेगाव येथे कामे करण्यात येणार आहेत. लातूर तालुक्यातील शिराळा येथे प्रातिनिधिक स्वरूपात या कामांना प्रारंभ होईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.डी. बोखारे यांनी दिली.(प्रतिनिधी) गतवर्षी विलासरावांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विकास कारखान्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ प्रकल्प राबविला आहे. यामध्ये समतल चर खोदून माथा ते पायथा जलसंधारण करण्यात आले आहे. विकास कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सावरगाव येथे हे काम करण्यात आले असून, आता नदी, नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाला उद्या जयंतीचे औचित्य साधून प्रारंभ केला जाणार आहे.

Web Title: Vilasrao Jayanti celebrates the birth anniversary of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.