शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

मराठवाड्यात अवकाळीचे थैमान; आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, ४ हजार हेक्टरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:45 IST

मे महिन्याला सुरुवात होताच बळीराजा मशागतीच्या कामाला लागला होता.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १७ दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. वीज कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू झाला. ३९१ जनावरे दगावली. ४ हजारांहून अधिक हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मे महिन्याला सुरुवात होताच बळीराजा मशागतीच्या कामाला लागला होता. खरिपासाठी जमीन तयार करून ठेवण्याचे काम मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सुरू होते. ३ मेपासून अचानक आभाळ भरून येणे, विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. रोज पाऊस सुरूच आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. मराठवाड्यात विजा कोसळून आतापर्यंत २७ नागरिकांचा मृत्यू, तर २१ जण जखमी झाले. मयतांमध्ये सर्वाधिक ७ जण जालना जिल्ह्यातील आहेत. जनावरांची जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ३९१ लहान- मोठी जनावरे मरण पावली. वादळ वाऱ्याने बीड जिल्ह्यात ३, परभणीत एका घराची मोठी पडझड झाली. अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या मराठवाड्यात ८४ आहे. अवकाळीने बाधित गावांची संख्या आता ५९७ पर्यंत पोहोचली असून, ७ हजार १४६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

शेतीपिकांचे मोठे नुकसानअवकाळी पावसाने जिरायत जमिनीवरील २५१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. १ हजार ८८४ हेक्टर बागायती पिकांचे तर २ हजार ८२ हेक्टरवरील फळबागांमधील पिकांचे नुकसान झाले.

वीज कोसळून कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?छत्रपती संभाजीनगर --------------३जालना-------------------------------७परभणी------------------------------१हिंगोली------------------------------२नांदेड--------------------------------५बीड----------------------------------५लातूर---------------------------------२धाराशिव-----------------------------२एकूण--------------------------------२७

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरी