विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा २७ मेपासून
By Admin | Updated: May 24, 2014 02:09 IST2014-05-24T01:47:41+5:302014-05-24T02:09:05+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २७ मेपासून अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे.

विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा २७ मेपासून
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे २७ मेपासून अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. यापूर्वी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले पेपर पुनर्मूल्यांकनासाठी (रिड्रेसर) विद्यापीठाकडे सादर केले. त्या रिड्रेसर पेपरचा निकाल अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पडण्यापूर्वीच विद्यापीठाने परीक्षा घोषित केल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २७ मेपासून परीक्षांना प्रारंभ होत आहे. विविध महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर तपासणीच्या तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केलेल्या उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती महाविद्यालयांमार्फत त्यांना देणे, त्यानंतर संबंधित प्राध्यापकांकडून ती पुन्हा तपासून घेऊन पुन्हा विद्यापीठास सादर करावी लागते. विद्यापीठाच्या कमिटीसमोर त्या उत्तरपत्रिका सादर करून आधी केलेल्या गुणदानात बदल करणे आवश्यक आहे अथवा नाही, हे स्पष्ट करावे लागते. त्यानंतरच पुनर्मूल्यांकनाचा निकाल घोषित करावा लागतो. त्यासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे पुनर्मूल्यांकन पेपरचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. एवढी सगळी कसरत पार पाडल्यानंतर विद्यापीठाने नुकताच निकाल घोषित केला आहे.