औरंगाबाद : तुम्ही दुचाकीवरून विनाहेल्मेट जात असाल आणि चौकातील पोलिसांची नजर चुकवून तुम्ही त्यांच्या तावडीतून सुटला तरी गड जिंकल्यागत वाटू देऊ नका. कारण तुम्ही पोलिसांची नजर चुकवू शकता, पण सीसीटीव्हीची नाही. त्यामुळे सीसीटीव्हीत कैद झालेल्या तुमच्या दुचाकी क्रमांकावरून काही दिवसांतच वाहतूक पोलीस पावती घेऊन थेट तुमच्या घरी पोहोचलेला असेल. त्यामुळे हेल्मेट घरी राहिले, जाऊ द्या आजच्या दिवस नाही वापरले तर काय होईल, आपण पोलिसांची नजर चुकवून जाऊ, असे वाटणाऱ्यांनो, आता तुमची खैर नाही.शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी सेफ सिटी प्रकल्पांतर्गत विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
विनाहेल्मेट फिराल तर थेट घरी येईल पावती
By admin | Updated: February 18, 2016 00:08 IST