शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

अशिक्षितही लढवू शकतो पदवीधरची निवडणूक

By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार पदवीधरच असावा, असा सर्वांचा समज आहे.

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार पदवीधरच असावा, असा सर्वांचा समज आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीसाठी शिक्षणाची अट नाही. त्यामुळे अशिक्षित व्यक्तीही ही निवडणूक लढवू शकते. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात २० जून रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २४ जून रोजी होणार आहे. पदवीधर मतदारांचे नेतृत्व करणारा किंवा निवडणूक लढविणारा उमेदवार हा पदवीधरच असावा, अशी अट असावी, असा सर्वांचा समज आहे; परंतु निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी अशी कोणतीही अट घातलेली नाही. केवळ उमेदवाराचे नाव राज्यातील कोणत्या तरी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असले पाहिजे, अशी एवढीच अट यासाठी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा सूचक असणे आवश्यक आहे. या सूचकांची नावे मात्र पदवीधर मतदारसंघाच्या यादीत असणे गरजेचे आहे. तसे असेल तरच अर्ज वैध ठरणार आहे. म्हणजेच उमेदवारासाठी शिक्षणाची अट नाही; परंतु त्यांच्या सूचकांसाठी मात्र आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पदवीधरच्या यादीत असण्याची अट नाही. त्याचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असले तरी तो ही निवडणूक लढवू शकतो. उमेदवाराच्या सूचकांचे नाव मात्र पदवीधर यादीमध्ये असणे आवश्यक आहे.