शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:41 IST

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले. 

छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या हॉटेलबाहेर जमले होते. त्यावेळी घोषणाबाजी करताना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, त्यामुळे आज आदित्य ठाकरे ज्या रामा हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे भाजपा कार्यकर्ते विरोध करण्यासाठी पोहचले होते. तिथे जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असा आरोप अंबादास दानवेंनी केला. तर भाजपा आंदोलकांनी आक्रमक होत आम्ही दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे संघटनात्मक दौऱ्यावर आलेले आहेत. आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार, परंतु कुणाच्या घरासमोर, हॉटेलसमोर आंदोलन करायचे नसते. भाजपा व्यक्तिगत हेतूने आंदोलन करत होते. शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिकांनी जे करायचे ते केले. पोलीस आणि भाजपा एकत्रित येऊनही आमच्या अंगावर आले तरी शिवसैनिक पुरून उरतील. आमचे आंदोलन देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी होते. आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते. आम्ही घोषणाबाजी केली नाही. काळी फिती लावून आंदोलन केले. संजय राठोड, राहुल शेवाळे यांचीही प्रकरणे आहेत ना, बदलापूर प्रकरणी पोलिसांनी दडपशाही केले. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलीस पक्षपातीपणे वागतायेत. आंदोलन करायचे होते तर क्रांती चौकात करायचे होते असं त्यांनी सांगितले. 

राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, माझ्याविरोधात जे आंदोलन केले ते मोदींविरोधात आम्ही आंदोलन केले त्यासाठी केले. आम्ही महिलांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. आम्ही शक्ती कायदा आणला, महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे? पोलिसांवर हल्ले होतायेत. बदलापूर प्रकरणी नागरिक रस्त्यावर येतात, त्यांना तुम्ही राजकीय बोलता, पण पीडित कुटुंबाची तक्रार घ्यायला १२ तास का लागले? आम्ही पक्षाविरोधात नाही तर विकृतीविरोधात आंदोलन केले. ज्यांना भाजपा घाबरते, त्याला बदनाम करण्याचं राजकारण भाजपा करतं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४