शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

ठाकरे गट अन् भाजपा कार्यकर्ते भिडले; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात मोठा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:41 IST

महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले. 

छत्रपती संभाजीनगर - शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते त्यांच्या हॉटेलबाहेर जमले होते. त्यावेळी घोषणाबाजी करताना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, त्यामुळे आज आदित्य ठाकरे ज्या रामा हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे भाजपा कार्यकर्ते विरोध करण्यासाठी पोहचले होते. तिथे जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि मोठा राडा बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असा आरोप अंबादास दानवेंनी केला. तर भाजपा आंदोलकांनी आक्रमक होत आम्ही दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, आदित्य ठाकरे संघटनात्मक दौऱ्यावर आलेले आहेत. आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार, परंतु कुणाच्या घरासमोर, हॉटेलसमोर आंदोलन करायचे नसते. भाजपा व्यक्तिगत हेतूने आंदोलन करत होते. शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिकांनी जे करायचे ते केले. पोलीस आणि भाजपा एकत्रित येऊनही आमच्या अंगावर आले तरी शिवसैनिक पुरून उरतील. आमचे आंदोलन देशातील महिलांच्या सुरक्षेविषयी होते. आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते. आम्ही घोषणाबाजी केली नाही. काळी फिती लावून आंदोलन केले. संजय राठोड, राहुल शेवाळे यांचीही प्रकरणे आहेत ना, बदलापूर प्रकरणी पोलिसांनी दडपशाही केले. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलीस पक्षपातीपणे वागतायेत. आंदोलन करायचे होते तर क्रांती चौकात करायचे होते असं त्यांनी सांगितले. 

राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, माझ्याविरोधात जे आंदोलन केले ते मोदींविरोधात आम्ही आंदोलन केले त्यासाठी केले. आम्ही महिलांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन केले. आम्ही शक्ती कायदा आणला, महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे? पोलिसांवर हल्ले होतायेत. बदलापूर प्रकरणी नागरिक रस्त्यावर येतात, त्यांना तुम्ही राजकीय बोलता, पण पीडित कुटुंबाची तक्रार घ्यायला १२ तास का लागले? आम्ही पक्षाविरोधात नाही तर विकृतीविरोधात आंदोलन केले. ज्यांना भाजपा घाबरते, त्याला बदनाम करण्याचं राजकारण भाजपा करतं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४