शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

उद्याच्या शटडाऊननंतर दोन एमएलडी पाणी वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:52 PM

शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी मनपाच्या पाणीपुरवठ्याचा खंडणकाळ नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद : शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जायकवाडीत वीज वितरण कंपनी दुरुस्तीचे काम करणार आहे. याच कालावधीत महापालिका तीन ठिकाणी असणारी पाणीगळती थांबविणार आहे. फारोळा, नक्षत्रवाडी आणि ढोरकीन येथेही पंपगृहाची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहराच्या पाण्यात किमान दोन एमएलडीने वाढ होणार आहे. याशिवाय काही अंशी पाणीवितरणही (डिस्चार्ज) वाढणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आली.

बुधवारी दुपारी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. शुक्रवारी खंडणकाळात वीज कंपनी, मनपातर्फे कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत, याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत  कोल्हे यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून महावितरण कंपनीला शटडाऊन पाहिजे होते. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये खंडणकाळाला आयुक्तांनी मंजुरी दिली. अवघ्या सहा तासांमध्ये महापालिका आणि महावितरण कंपनी संपूर्ण ताकदीने विविध दुरुस्तीची कामे करणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी सध्या असलेले पाणी फेकून न देता जपून ठेवावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

मनपातर्फे होणारी मोठी कामेढोरकीन येथे दोन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येईल. ढाकेफळ येथे काही व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ढोरकीन येथे पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे. आर.एल. स्टीलजवळ मोठा व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यात येईल. अजित सीडस्जवळही एक मोठी दुरुस्ती आहे.

दुरुस्तीचे फायदे कायजायकवाडीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. भविष्यात हा त्रास कमी होईल. धरणातून पाणी ओढण्याची क्षमता पूर्वीच्या तुलनेत वाढणार आहे. दोन एमएलडी पाण्याची वाढ विविध कामे झाल्यावर अपेक्षित आहे. जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी, ढोरकीन येथे पंपगृहांसह छोटी-मोठी कामे करण्यात येतील.

उपाययोजना कराशुक्रवारी शहरात अजिबात पाणीपुरवठा होणार नाही. शहरात महापालिकेच्या मालकीचे ७९ टँकर आहेत. हे सर्व टँकर आणीबाणीच्या परिस्थितीसाठी म्हणून भरून ठेवण्यात यावेत, अशी सूचना महापौर घोडेले यांनी केली. शहरातील काही पाण्याच्या टाक्यांमध्ये आणीबाणी म्हणून पाणी साठवून ठेवावे. मागणी खूपच वाढल्यास या टाक्यांमधील पाणी टँकरने द्यावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाmahavitaranमहावितरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी