शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी बाराशे कोटी

By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे.

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५३ कोटी रुपये वाढीव कर्ज वाटप यावर्षी केले जाणार आहे.मराठवाड्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम आहेत. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पैशांची निकड भासते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता, राष्ट्रीयीकृत बँकांकडून दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप केले जाते. गतवर्षी ९४०.८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. बँकांनी १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत ९८७.६६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते.जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राधान्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रात कर्ज वाटप करावयाचा आराखडा जाहीर केला आहे. १६९२.०६ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. त्यात १६१.९६ कोटी रुपयांचे मुदत कर्ज, सुक्ष्म व लघू उद्योगासाठी ८०.५१ कोटी रुपयांचे गैर कृषी कर्ज, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी (गृह, शैक्षणिक व इतर) १३७.६६ कोटी रुपये, गैरप्राधान्य क्षेत्रासाठी १२०.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्चित केले आहे. दरवर्षी बँकांना कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत मिळत नाही. बँक प्रशासन कागदपत्र आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडते. वेळेत हे कर्ज मिळाले नाही तर हा पैसा शेतकऱ्यांना कामी येत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत जाते. त्यामुळे बँकाँनी कृषी कर्जाचे वाटप वेळेत करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.गतवर्षी असा होता आराखडा२०१३-१४ या वर्षात बँकांनी कृषी कर्जासाठी ९४०.८५ कोटी, कृषी मुदत कर्जासाठी ११९.४० कोटी, गैरकृषी कर्जासाठी ७९.७७ कोटी, इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १३०.१३ कोटी, गैरप्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी ९०.५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी १३६०.६५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता.प्राधान्याने कर्जपुरवठा करा : धसकृषी विकासात बँकींग क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बँकांनी ग्रामीण क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सुरेश धस यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्जासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. जारोंडे, विजय भांबळे यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक, सहकार व उद्योग विभागासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.धस म्हणाले, बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील खातेदारांची संख्या लक्षात घेता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सर्व खातेदारांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. उद्दिष्टपूर्र्तीसाठी जिल्ह्यातील बँकांना नवीन खाती उघडण्याचे निर्देशही धस यांनी दिले.