शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:38 PM

गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वीस तासांचे भारनियमन सुरु आहे

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू केलेले वीस तासांचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२३ ) रात्री विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर नाईलाजाने जायकवाडीतुन उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

गोदापात्रातून होणारा अधिकृत पाणीउपसा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज फक्त चार तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिल्याने  बॅकवॉटर परिसरात महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून दररोज वीस तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. वीज पुरवठा कमी केल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक पाण्याअभावी  वाया जाण्याची भीती आहे. 

याबाबत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेतली.  चार तास होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी पिकं कशी जतन करावी असा सवाल विभागीय आयुक्तांना विचारण्यात आला. गहू, ज्वारी, कांदा, आणि चारा पिके यांना जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज आवश्यक आहे. या भागातील  शेतकऱ्यांनी कर्ज काढुन पीके उभी केली असून पाण्याअभावी ही पिके हातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले.

प्रशासनाने तात्काळ आठ तासांचा सुरळीत वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेतीला उद्योगाच्या अगोदर प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ महावितरण आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन आयुक्त भापकर यांनी दिले. 

या वेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, शेकापचे महेश गुजर, मिलिंद पाटील, शेतकरी नेते पी.आर.जाधव, संजय गायकवाड, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, पांडुरंग चव्हाण, राहुल पारखे, सर्फराज पठाण, बाबुराव केकते, संतोष एरंडे आदींसह गंगापूर आणि पैठणचे शेतकरी हजर होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेती