शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:04 PM

तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला.

औरंगाबाद : तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. हे प्रशिक्षण मुंबईतील भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सांभाळलेली आहे. त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, सिडको, छावणी आणि वाळूज या चार डिव्हिजनअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कारभार पाहिला जातो. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक कार्यरत असून, सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम करीत आहेत.

वाहतूक विभागात सुमारे २५० पोलीस कर्मचारी आहेत. या सर्व वाहतूक पोलिसांना आणि पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांना मूलभूत वाहतूक नियमन कसे करावे, वाहतूक नियमनासंदर्भात नव्याने आलेल्या आधुनिक उपकरणाचा वापर कसा करावा, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, स्पीड गण यासह अन्य उपकरणे कशी हाताळावीत, वाहनचालकांसोबतचे होणारे वाद टाळण्यासाठी कसे संभाषण करावे, यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाहतूक पोलिसांना भायखळा येथील ट्रॅफिक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. येथील कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकी ५० कर्मचार्‍यांच्या पाच बॅच एकानंतर एक भायखळा येथे पाठविण्यात येणार आहेत. ५० कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर कर्मचार्‍यांचा निर्माण होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यालयातील कर्मचार्‍यांची मदत घेतली जाईल, असे डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादMilind Bharambeमिलिंद भारंबे