शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

राज्यातील व्यापाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर हवे ‘व्यापारी कल्याण मंडळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:16 IST

महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे

छत्रपती संभाजीनगर : राज्यच नव्हे तर देशाच्या विकासात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षा निर्माण करणे, व्यापारी हित व व्यवसायाच्या वृद्धीसाठी विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने नुकतेच दिल्ली सरकारने ‘ व्यापारी कल्याण मंडळा’ची स्थापना केली आहे. याचा तेथील ८ लाख व्यापाऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘व्यापार कल्याण मंडळा’ची घोषणा करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली.

कोणत्या राज्यात आहे ‘व्यापारी कल्याण मंडळ’?देशात हरियाणा, उत्तर प्रदेशात ‘व्यापारी कल्याण मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. त्यांचे कामकाजही सुरळीत सुरू आहे. त्यापाठोपाठ नुकतेच दिल्ली सरकारनेही ‘व्यापारी कल्याण मंडळ’ स्थापन केले.

काय आहेत फायदे?कर्ज : व्यापारी कल्याण मंडळाकडून व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज मिळू शकते.अनुदान : काही विशेष परिस्थितीत, मंडळाकडून व्यापाऱ्यांना आर्थिक अनुदान मिळू शकते.विमा संरक्षण : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आरोग्य विमा, जीवन विमा आणि इतर विमा योजनांचा लाभ मिळतो.व्यावसायिक प्रशिक्षण : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळू शकते.कायदेशीर सल्ला : मंडळाकडून व्यापाऱ्यांना कायदेशीर सल्ला आणि मदत मिळू शकते.सामाजिक सुरक्षा : मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.वृद्धापकाळात साहाय्य : व्यापाऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक साहाय्य आणि इतर सोयी-सुविधा मिळू शकतात.

व्यापाऱ्यांना सक्षम बनविणेतीन दशकांपेक्षा अधिक काळापासून देशांतर्गत व्यापार धोरण ठरविण्याची मागणी करत आहोत. त्याचा एक भाग म्हणजे ‘ व्यापारी कल्याण मंडळ’ होय. व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणे आणि त्यांना सक्षम बनवणे हा यामागील उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात व्यापारी कल्याण मंडळाची स्थापना करावी. यासाठी सर्व व्यापारी संघटना मिळून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत.- अजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्र