शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:27 IST

अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले.

ठळक मुद्देगाइड, टॅक्सीवाले, फेरीवाले, हॉटेल आम्ही सगळे पर्यटनावर अवलंबून आम्ही काय खावे आणि कुटुंबाला कसे पोसावे, याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे.

औरंगाबाद : अंशत: लॉकडाऊनदरम्यान पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्मारकेही बंद ठेवण्याचा तुघलकी निर्णय शहर प्रशासनाने एका रात्रीतून घेतल्यामुळे दि. ११ रोजी पर्यटन स्थळी आलेल्या पर्यटकांना आणि त्यांना तिथे घेऊन आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एका रात्रीतून निर्णय फिरविण्याची ही कोणती तुघलकी तऱ्हा आहे, असे म्हणत पर्यटन जगताकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. एवढ्या लांबचा प्रवास करून आलो आणि येथे येऊन मोठा टाळा बघावा लागला, असे म्हणत पर्यटकांनी महाराष्ट्र शासन आणि औरंगाबाद शहर प्रशासन यांच्या अजब कारभारावर प्रचंड तोंडसुख घेतले. अंशत: लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ७ रोजी पहिला अध्यादेश काढला होता. यामध्ये लॉकडाऊन काळात पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक स्मारके याबाबत कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे शनिवार-रविवारचा कडक लॉकडाऊन वगळता अन्य दिवशी पर्यटन स्थळे नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असा पर्यटन व्यावसायिकांचा अंदाज होता. त्यामुळे पर्यटकांना तशी आगाऊ सूचना देऊन शनिवार- रविवारचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. परंतु अचानक दि. १० रोजी रात्री शहर प्रशासनाकडून आदेश काढण्यात आला आणि दि. ११ पासून औरंगाबाद शहर व परिसरातील सर्व पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्मारके बंद करण्यात आली. यामुळे आता येणाऱ्या पर्यटकांना कसे तोंड द्यावे, असा प्रश्न गाइड आणि पर्यटन व्यावसायिकांना पडला आहे.

माझ्यासोबत आलेले संजीव सेठी नोएडा येथून आले होते. तिकीट काढायला गेल्यावर आम्हाला अजिंठा लेणी बंद असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे अनेक पर्यटकांना परत जावे लागले. गाइड, टॅक्सीवाले, फेरीवाले, हॉटेल आम्ही सगळे पर्यटनावर अवलंबून आहोत. अजिंठा लेणी पाहायला दररोज १०० पर्यटकही येत नाही. लेणी परिसर एवढा विस्तीर्ण आहे की साेशल डिस्टन्सिंग पुरेपूर पाळले जाते, असे असताना पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही काय खावे आणि कुटुंबाला कसे पोसावे, याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे. जर प्रशासन आम्हाला प्रत्येकाला १० हजार रुपये महिना आणि वर्षभराचे रेशन देत असेल तर तुम्ही वर्षभर पर्यटन स्थळे बंद ठेवा. आमची काही हरकत नाही. अन्यथा तुमच्या या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे, अशी भूमिका अजिंठा येथील गाइड अबरार यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी घेतली आहे. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद